लाॅकडाऊन काळातील गुन्ह्यात होऊ शकते जबर शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:14 AM2021-05-15T11:14:08+5:302021-05-15T11:14:17+5:30

Khamgaon News : साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम २६९ आणि कलम २७० नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत.

Crimes of the lockdown period can lead to severe punishment | लाॅकडाऊन काळातील गुन्ह्यात होऊ शकते जबर शिक्षा

लाॅकडाऊन काळातील गुन्ह्यात होऊ शकते जबर शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची अवहेलना करणे) या गुन्ह्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम २६९ आणि कलम २७० नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. ही कलमे  गंभीर स्वरूपाची असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम ही नागरिकांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विचार करण्याची गरज आहे. 
गतवर्षी कोविडची प्रचंड भीती नागरिकांच्या मनात होती. ही बाब लक्षात घेऊन विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ नुसार (लोकसेवकांच्या आदेशाचे पालन न करणे) गुन्हे शहर पोलिसांनी नोंदविले. मात्र तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गुन्हे परत घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान. त्यांचे पद गेले आणि गुन्हे परत घेण्याविषयी कोणतेही आदेश पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत.  दरम्यान, कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर कलम १८८ सोबतच कलम २६९, २७० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरूपाचे कलमे लावून गुन्हा दाखल केले जात आहेत. हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही. 


व्हिसा ही नाकारला जाऊ शकतो 
पोलिसांकडून नोंद केल्या जात असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. या गुन्ह्याच्या खटल्याला सामोरे जावे लागेल. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अनेक देशाकडून व्हिसा नाकारला जातो. शिवाय पासपोर्ट मिळविताना ही अडचणी येण्याची शक्यता आहे.

Web Title: Crimes of the lockdown period can lead to severe punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.