शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मलकापूर येथे कापूस खरेदी झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:46 IST

परिस्थिती गंभीर होण्याची शंका असल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे.

ठळक मुद्दे १४ हजार ५५७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. जवळपास ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. ५ डिसेंबरपासूनच कापूस खरेदी बंद करण्यात आली.

- मनोज पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कापूस खरेदी दरम्यान परिस्थिती गंभीर होण्याची शंका असल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सुमारे १३ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सीसीआयच्या केंद्रावर हलक्या प्रतीचा ओलावा असणारा कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, तसेच शेतकऱ्यांना भडकावणे असे प्रकार घडून अडचणी निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची मागणीही केली आहे.  कापूस विक्रीकरिता जवळपास १४ हजार ५५७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने बाजार समितीकडे नोंदणी केली. नोंदणीनंतर आतापर्यंत १ हजार ४०० शेतकऱ्यांचा जवळपास ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. दरम्यान, २ डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांना कुण्यातरी व्यक्तीकडून कापूस खरेदी करू देणार नाही, अशी धमकी  देण्यात आली. कापूस खरेदीसाठी नोंदणी दरम्यान बाजार समितीच्यावतीने मूळ कास्तकारांचा वास्तविक फोटो न घेता आधार कार्ड व पासबुकची झेरॉक्स प्रत घेण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कास्तकारांच्या सात-बारावर नाॅन एफएक्यू कापूस सीसीआयला विकणे सुरू केले. त्यामुळे  व्यापाऱ्यांचा नॉन एफएक्यू दर्जाचा कापूस परत करण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी संबंधितांनी वजन न करता गाडी लॉक करून जागेवर सोडून देत निघून गेले.  या परिस्थितीत सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदी करणे अशक्य आहे, त्यामुळे ५ डिसेंबरपासूनच कापूस खरेदी बंद करण्यात आली. भारतीय कपास निगम लिमिटेडचे महाप्रबंधक अजयकुमार यांनी कापूस खरेदी सुरळीत सुरू राहावी, यासाठी सुरक्षेची मागणी केली आहे.

टॅग्स :MalkapurमलकापूरcottonकापूसFarmerशेतकरी