शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:10 IST

एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला सुमारे ८ कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. ‘लॉकडाउन’ आणखी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘लॉकडाउन’चे पालन व्हावे, यादृष्टीकोणानातून प्रत्येक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून याठिकाणी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे २१ दिवसांच्या ‘लॉकडाउन’च्या काळात एसटीच्या बुलडाणा विभागाला ८ कोटी ८० लाखांचा फटका बसला आहे. दरम्यान, देशात सुरुवातीला लागू करण्यात आलेले २१ दिवसांचे ‘लॉकडाउन’ १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र राज्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ‘लॉकडाउन’ ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरून एसटीच्या बुलडाणा विभागाला कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. मात्र ३० एप्रिलपर्यंत सेवा बंद राहिल्यास बुलडाणा विभागाचे नुकसान आणखी ६ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळाची सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात राज्यस्तरावर चर्चा सुरू आहे. त्या त्या विभागातील आजाराची तीव्रता पाहून लांब पल्ल्याच्या बस वगळता इतर सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. यानुसार बुलडाणा विभागाबाबत काय निर्णय होतो, यावरच पुढील दिशा ठरणार आहे.-संदीप रायलवार,विभाग नियंत्रक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस