शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात ...

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यानंतरही काहींनी मंदिरामध्ये तर काहींनी शेतात लग्न पार पाडले आहे. शहरात दरवर्षी किमान एक हजारपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्या वेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले तहसीलदार, नगरपालिका, पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पाडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू-वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

चालू महिन्यातील लग्न तारखा ढकलल्या पुढे

बुलडाणा शहरात लहान, मोठी २८ मंगल कार्यालये, लॉन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

२६८ जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेज

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलाविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू-वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०२० मध्ये २६८ जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली. तर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत १३० विवाह झाले असून, १४४ अर्ज प्राप्त आहेत.

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर गदा आलेली आहे. त्यातच लग्न, मुंज हे कार्यक्रम म्हणजे कुटुंबाच्या आनंदामध्ये त्याचबरोबर जगण्यामध्ये बळ देण्याचे काम करतात. पण कोरोनामुळे यावर विरजण पडले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, त्याचबरोबर केटरर्स, स्वयंपाकी आणि कामगार या सगळ्यांवरच मोठे संकट ओढवलेले आहे. कार्यालयाची मर्यादा एकदम कमी करण्यात आलेली आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालय पंचवीस माणसांसाठी किंवा पन्नास माणसांसाठी घेणे परवडत नाही. लोकांकडून घेतलेले ॲडव्हान्स परत करावे लागले. काहींनी भाडेतत्त्वावर मंगल कार्यालये घेतलेले आहेत त्यांचीही पंचाईत झालेली आहे.

- बबन परांजपे, मंगल कार्यालय चालक, बुलडाणा