शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात ...

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यानंतरही काहींनी मंदिरामध्ये तर काहींनी शेतात लग्न पार पाडले आहे. शहरात दरवर्षी किमान एक हजारपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्या वेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले तहसीलदार, नगरपालिका, पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पाडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू-वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

चालू महिन्यातील लग्न तारखा ढकलल्या पुढे

बुलडाणा शहरात लहान, मोठी २८ मंगल कार्यालये, लॉन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

२६८ जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेज

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलाविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू-वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०२० मध्ये २६८ जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली. तर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत १३० विवाह झाले असून, १४४ अर्ज प्राप्त आहेत.

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर गदा आलेली आहे. त्यातच लग्न, मुंज हे कार्यक्रम म्हणजे कुटुंबाच्या आनंदामध्ये त्याचबरोबर जगण्यामध्ये बळ देण्याचे काम करतात. पण कोरोनामुळे यावर विरजण पडले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, त्याचबरोबर केटरर्स, स्वयंपाकी आणि कामगार या सगळ्यांवरच मोठे संकट ओढवलेले आहे. कार्यालयाची मर्यादा एकदम कमी करण्यात आलेली आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालय पंचवीस माणसांसाठी किंवा पन्नास माणसांसाठी घेणे परवडत नाही. लोकांकडून घेतलेले ॲडव्हान्स परत करावे लागले. काहींनी भाडेतत्त्वावर मंगल कार्यालये घेतलेले आहेत त्यांचीही पंचाईत झालेली आहे.

- बबन परांजपे, मंगल कार्यालय चालक, बुलडाणा