शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात ...

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यानंतरही काहींनी मंदिरामध्ये तर काहींनी शेतात लग्न पार पाडले आहे. शहरात दरवर्षी किमान एक हजारपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्या वेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले तहसीलदार, नगरपालिका, पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पाडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू-वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

चालू महिन्यातील लग्न तारखा ढकलल्या पुढे

बुलडाणा शहरात लहान, मोठी २८ मंगल कार्यालये, लॉन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

२६८ जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेज

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलाविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू-वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०२० मध्ये २६८ जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली. तर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत १३० विवाह झाले असून, १४४ अर्ज प्राप्त आहेत.

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर गदा आलेली आहे. त्यातच लग्न, मुंज हे कार्यक्रम म्हणजे कुटुंबाच्या आनंदामध्ये त्याचबरोबर जगण्यामध्ये बळ देण्याचे काम करतात. पण कोरोनामुळे यावर विरजण पडले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, त्याचबरोबर केटरर्स, स्वयंपाकी आणि कामगार या सगळ्यांवरच मोठे संकट ओढवलेले आहे. कार्यालयाची मर्यादा एकदम कमी करण्यात आलेली आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालय पंचवीस माणसांसाठी किंवा पन्नास माणसांसाठी घेणे परवडत नाही. लोकांकडून घेतलेले ॲडव्हान्स परत करावे लागले. काहींनी भाडेतत्त्वावर मंगल कार्यालये घेतलेले आहेत त्यांचीही पंचाईत झालेली आहे.

- बबन परांजपे, मंगल कार्यालय चालक, बुलडाणा