शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात ...

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही वर्षभरामध्ये अनेकांनी कोरोनाला न जुमानता लग्न थाटात पार पाडले आहे. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यानंतरही काहींनी मंदिरामध्ये तर काहींनी शेतात लग्न पार पाडले आहे. शहरात दरवर्षी किमान एक हजारपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्या वेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले तहसीलदार, नगरपालिका, पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पाडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू-वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

चालू महिन्यातील लग्न तारखा ढकलल्या पुढे

बुलडाणा शहरात लहान, मोठी २८ मंगल कार्यालये, लॉन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

२६८ जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेज

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलाविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू-वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०२० मध्ये २६८ जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली. तर जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ पर्यंत १३० विवाह झाले असून, १४४ अर्ज प्राप्त आहेत.

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर गदा आलेली आहे. त्यातच लग्न, मुंज हे कार्यक्रम म्हणजे कुटुंबाच्या आनंदामध्ये त्याचबरोबर जगण्यामध्ये बळ देण्याचे काम करतात. पण कोरोनामुळे यावर विरजण पडले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय, त्याचबरोबर केटरर्स, स्वयंपाकी आणि कामगार या सगळ्यांवरच मोठे संकट ओढवलेले आहे. कार्यालयाची मर्यादा एकदम कमी करण्यात आलेली आहे. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालय पंचवीस माणसांसाठी किंवा पन्नास माणसांसाठी घेणे परवडत नाही. लोकांकडून घेतलेले ॲडव्हान्स परत करावे लागले. काहींनी भाडेतत्त्वावर मंगल कार्यालये घेतलेले आहेत त्यांचीही पंचाईत झालेली आहे.

- बबन परांजपे, मंगल कार्यालय चालक, बुलडाणा