शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नसताना केले पुलाचे बांधकाम

By admin | Updated: February 27, 2015 01:09 IST

मलकापूर येथे दोन किलोमीटरच्या परिसरात आठ पूल असतानाही नवव्या पुलाची निर्मिती.

विजय वर्मा / मलकापूर (जि. बुलडाणा): पाटबंधारे विभागाची परवानगी न घेताच येथील मोहनपुरा ते मदारटेकडीला जोडणार्‍या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे; मात्र आता हे बांधकाम तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन किमी. परिसराचे अंतरात आठ पूल असताना नवव्या नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नगर परिषदेचा सुरू असलेला मनमानी कारभार समोर येत आहे. शहरातून वाहत जाणार्‍या नळगंगा नदीवर बोदवड पुलापासून ते रेल्वे पुलापर्यंत १ ते २ कि.मी. अंतरात पारपेठ, सालीपुरा, काशीपुरा या भागाशी संपर्क करण्याकरिता सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. असे असतानाही आणखी काही पूल निर्माण करण्याची योजना नगर परिषदने आखली आहे. नळगंगा नदीवर ५0 ते ६0 वर्षांपूर्वी फक्त चार पूल होते. पारपेठमध्ये वाहने जाण्यास मोठा व छोटा पूल निकामी असल्याने मोठय़ा पुलाच्या बाजूला नगराध्यक्षपदी विनयकुमार मुंधडा असताना एक लहान पुलाची निर्मिती तसेच सालीपुरा येथे जाण्यासाठी बारादरी ते सालीपुरा या पुलाची निर्मिती करण्यात आली होती; मात्र दोन्ही पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात रहदारी करणे अशक्य आहे, तर मागीलवर्षी मंगलगेटवरून काशीपुरा व बोदवड रस्त्यावर जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच नुकतेच छोट्या पुलाच्या १५ फूट अंतरावर छोटा बाजार ते पारपेठला जोडणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर बडा हनुमान मंदिर ते पारपेठ व मोहनपुरा ते मदार टेकडीला जोडण्यात येणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे; मात्र त्याचे अंदाजपत्रक व नगर परिषदेच्यावतीने नवीन पुलाच्या निर्मितीसाठी सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेले असल्याने भविष्यात या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नगर परिषद प्रशासनाने मलकापूर येथील नळगंगा नदीही पाटबंधारे विभाग यांच्या अखत्यारित असतानासुद्धा त्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मलकापूर येथील नळगंगा नदीवर मोहनपुरा ते मदार टेकडी या भागात पूर्वी पुरातन काळातील छोट्या पुलाशेजारी लाखो रुपये खर्चुन ९ व्या पुलाचे निर्माण कार्य सुरु केले आहे. या पुलाअगोदर आठ पूल नदीपात्रात असतानासुद्धा कोणत्याही प्रकारची गरज नसताना या पुलाची निर्मिती नगर परिषद प्रशासन करीत आहे. नळगंगा नदीला पावसाळ्यात येणार्‍या पुराच्या पाण्याचा प्रवाह या पुलाच्या निर्मितीमुळे बदलून येणार्‍या पुराचे पाणी शहरात घुसून जनतेच्या आर्थिक व जीवित हानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे या पुलाच्या निर्मितीमागे खरा उद्देश कोणता, याच्या चौकशीची गरज व्यक्त होत आहे.