शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचा आसूड मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:03 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला.

ठळक मुद्देशेतकरी सन्मानाऐवजी शेतकऱ्यांचा अपमान करणारी ही योजना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे यांनी केला. घोषणा फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोर्चामध्ये सहभागी झाला आहे.

बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला असून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान, राज्य शासनाची कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवी योजना असून शेतकरी सन्मानाऐवजी शेतकऱ्यांचा अपमान करणारी ही योजना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी केला आहे. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘इटा पिडा टळो आणि मोदी देशातून पळो’ अशी घोषणाच केली. हे सरकार फक्त समस्या घेऊन आले आहे. शेतकरी, व्यापारी, युवा वर्ग, मजूर सर्वच या समस्येमध्ये अडकले आहेत. बँक कर्ज देत नाही, व्यापारी उधार देत नाही, पाऊस पडत नाही आणि पीक कर्ज ही मिळत नाही, अशा या समस्या या सरकारच्या काळात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सत्तेतून त्यांना खाली खेचण्यासाठी सर्वांनी आता रस्त्यावर उतरण्याचे आवाहन सपकाळ यांनी केले. शहरातील जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकूल वासनिक यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त द्वय बोलत होते. यावेळी आ. विरेंद्र जगताप, माजी खासदार उल्हास पाटील, अजहर हुसैन, श्याम उमाळकर, माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसमधील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरीकडे यावेळी बोलताना माजी आ. दिलीपकुमार सानंदा भाजप सरकार देशात धार्मिक तणाव निर्माण करत असून मराठा आरक्षण, धनगर समाज आरक्षणाचे नुसतेच आश्वानस या सरकारने दिले आहे. प्रत्यक्षात दिलेल्या एकाही आश्वासनाची त्यांनी पुर्तता केली नसल्याचे ते म्हणाले. सोबतच ‘फेकू भगाव देश बचाव’ असा नाराच जिजामाता प्रेक्षागारात मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी दिला. सध्या जिजामाता प्रेक्षागारातून हा मोर्चा निघाला असून संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक हे उपस्थितांना संबोधित करणार आहे. दरम्यान, या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी वर्ग सहभागी झाला असून ‘नुसत्याच घोषणा, घोषणांचे गाजर, कर्जमाफी द्या... कुठे आडवे गेले मांजर’ असे घोषणा फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोर्चामध्ये सहभागी झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय