शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचा आसूड मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 16:03 IST

बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला.

ठळक मुद्देशेतकरी सन्मानाऐवजी शेतकऱ्यांचा अपमान करणारी ही योजना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे यांनी केला. घोषणा फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोर्चामध्ये सहभागी झाला आहे.

बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला असून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान, राज्य शासनाची कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवी योजना असून शेतकरी सन्मानाऐवजी शेतकऱ्यांचा अपमान करणारी ही योजना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी केला आहे. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘इटा पिडा टळो आणि मोदी देशातून पळो’ अशी घोषणाच केली. हे सरकार फक्त समस्या घेऊन आले आहे. शेतकरी, व्यापारी, युवा वर्ग, मजूर सर्वच या समस्येमध्ये अडकले आहेत. बँक कर्ज देत नाही, व्यापारी उधार देत नाही, पाऊस पडत नाही आणि पीक कर्ज ही मिळत नाही, अशा या समस्या या सरकारच्या काळात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सत्तेतून त्यांना खाली खेचण्यासाठी सर्वांनी आता रस्त्यावर उतरण्याचे आवाहन सपकाळ यांनी केले. शहरातील जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकूल वासनिक यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त द्वय बोलत होते. यावेळी आ. विरेंद्र जगताप, माजी खासदार उल्हास पाटील, अजहर हुसैन, श्याम उमाळकर, माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसमधील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरीकडे यावेळी बोलताना माजी आ. दिलीपकुमार सानंदा भाजप सरकार देशात धार्मिक तणाव निर्माण करत असून मराठा आरक्षण, धनगर समाज आरक्षणाचे नुसतेच आश्वानस या सरकारने दिले आहे. प्रत्यक्षात दिलेल्या एकाही आश्वासनाची त्यांनी पुर्तता केली नसल्याचे ते म्हणाले. सोबतच ‘फेकू भगाव देश बचाव’ असा नाराच जिजामाता प्रेक्षागारात मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी दिला. सध्या जिजामाता प्रेक्षागारातून हा मोर्चा निघाला असून संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक हे उपस्थितांना संबोधित करणार आहे. दरम्यान, या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी वर्ग सहभागी झाला असून ‘नुसत्याच घोषणा, घोषणांचे गाजर, कर्जमाफी द्या... कुठे आडवे गेले मांजर’ असे घोषणा फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोर्चामध्ये सहभागी झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय