लेखी आश्वासनाने शेतकऱ्यांच्या उपाेषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST2021-03-18T04:35:01+5:302021-03-18T04:35:01+5:30
अमडापूर ते मेडशिंगा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते निकृष्ट ...

लेखी आश्वासनाने शेतकऱ्यांच्या उपाेषणाची सांगता
अमडापूर ते मेडशिंगा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याचा आराेप करून शेतकऱ्यांनी काम बंद पाडले हाेते. त्यानंतर वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच उपाेषण सुरू केले हाेते. शेतकऱ्यांच्या उपाेषणाची दखल घेत उपअभियंत्यांनी ज्या ठिकाणी शेतकरी व गावकरी सांगतील त्या ठिकाणी डांबरीकरण करून दुरूस्ती करण्यात येईल. तसेच संपूर्ण झालेल्या कामावर नव्याने सेलकोट करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. २२ मार्च रोजी काम सुरू करण्यात येईल, असे लेखी निवेदन उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य पुत्र प्रकाश खराडे, सागर कदम, भागवत शेजोळ, गोविंद सोनूने, यांना देऊन उपोषणाची उपअभियंता बुलडाणा अनिल पाटील व त्यांचे सहकारी कोरडे यांनी सांगता केली. सदर यावेळी शेतकरी व गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.