शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा केसाने गळा कापला : राजपूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST

चिखली : आघाडी सरकार जातिजातीत भांडणे लावत असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्प्रयासाने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण या ...

चिखली : आघाडी सरकार जातिजातीत भांडणे लावत असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्प्रयासाने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमवावे लागले़ आता आघाडी सरकारच्याच निष्काळजीपणाने ओबीसींचे आरक्षण गमवावे लागल्याने या सरकारने मराठा समाजाच्यासोबतच ओबीसींचा सुद्धा केसाने गळा कापल्याचा घणाघाती आरोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत यांनी केला़ चिखली येथे भाजपाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बाेलत हाेते़

ओबीसी आरक्षण प्रकरणी भाजपच्यावतीने आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर राजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, नगरसेवक गोविंद देव्हडे, नाम गुरुदासानी, अनुप महाजन, दिलीप डागा, अॅड. संजीव सदार, सागर पुरोहित, विजय खरे, किशोर जामदार, अक्षय भालेराव, रणजित देव्हडे, रमेश सोळंकी, रमेश अकाळ, सचिन कोकाटे, चेतन देशमुख, विजय वाडेकर, सचिन कुलवंत, श्रीकृष्ण चौथे, विठ्ठल परिहार, दिगांबर जाधव, ज्ञानेश्वर वाघ, निवृत्ती जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.