ग्रामीण भागात होणार स्वच्छ पाण्याचा पुरवठा

By Admin | Updated: March 29, 2017 15:35 IST2017-03-29T15:35:25+5:302017-03-29T15:35:25+5:30

धाड ग्रामपंचायतीने दखल घेत पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Clean water supply to rural areas |  ग्रामीण भागात होणार स्वच्छ पाण्याचा पुरवठा

 ग्रामीण भागात होणार स्वच्छ पाण्याचा पुरवठा

धाड : बुलडाणा तालुक्यातील बहूतांश गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होत
असल्याचे वृत्त्त लोकमतने प्रकाशित करताच धाड ग्रामपंचायतीने दखल घेत
पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
 धाडसह तेरा गावांना अधिग्रहीत विहिरीतून कोणत्याहीप्रकारे शुद्धीकरण न
करता सरळ पाणीपुरवठा करण्यात येतो. या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  याबाबत वृत्त प्रकाशित करताच सरपंच
रिजवान सौदागर यांनी  जलशुद्धीकरण करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.
गावात येणारे पाणीशुद्ध करण्यासाठी शासनाने शुद्धीकरण यंत्र बसवावे अशी
मागणी त्यांनी आ. राहूल बोंद्रे यांच्याकडे केली आहे. जिल्हा
प्रशासनाकडेही मागणी केली आहे. आमदार निधी किंवा जिल्हा प्रशासनाकडून
निधी मिळाला नाही तर ग्रामपंचायत स्वखर्चाने जलशुद्धीकरण केंद्र सुरू
करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Clean water supply to rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.