शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चिखली : मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध चिखलीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:43 AM

चिखली: बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले असून, यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोन्सेंटो कंपनीविरुद्ध कारवाई करण्यासाठी  तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. यानंतर तालुका कृषी अधिकार्‍यांनी  मोन्सॅन्टो  कंपनीविरुद्ध   चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर मंगळवारी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देबाेंडअळी : स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर कृषी विभागाने केली तक्रार 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले असून, यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोन्सेंटो कंपनीविरुद्ध कारवाई करण्यासाठी  तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. यानंतर तालुका कृषी अधिकार्‍यांनी  मोन्सॅन्टो  कंपनीविरुद्ध   चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर मंगळवारी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे यावर्षी बोंडअळीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यापासून तर यवतमाळ, नागपूरपर्यंत बीटी कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने शेतकर्‍यांना कपाशी अक्षरश: उपटून टाकावी लागली. कपाशी लागवडीवर झालेला खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी त्नस्त झाला आहे. जागतिक कीर्तीच्या मोन्सॅन्टो कंपनीचे बीटी कपाशीचे वाण विकसित केले होते व बीटीचे हे वाण भारतात सर्वप्रथम मोंन्सेंटो कंपनीनेच आणले होते व भारतात विक्री करण्यासाठी मोन्सॅन्टो व महिको कंपनीचा करार झाला होता. विशेष म्हणजे एका एकरात १२ ते १५ क्विंटल उत्पादनाचा तसेच कोणत्याही प्रकारच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव बियाण्यावर होत नसल्याचा दावा कंपनीने केला होता. प्रत्यक्षात बीटी कपाशीची लागवड करणार्‍या चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील बाबुराव नामदेव गरूड या शेतकर्‍याने दोन एकरात पारस ब्रह्म या बीटीची लागवड केली होती; मात्न त्याला एका एकरात केवळ ७५ किलोच कापूस झाला. त्यामुळे या शेतकर्‍याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. त्या तक्र ारीची गंभीर दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे यांनी १९ डिसेंबर रोजी चिखली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. हे आंदोलन रात्नी उशिरा सुरूच होते. दरम्यान, ‘स्वाभिमानी’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी ए.टी. सुरडकर यांनी शेतकर्‍यासह चिखली शहर पोलीस स्टेशनला मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केल्याने या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४२७ कॉटन सीड अँक्ट २00९ च्या कलम १३ (१) नुसार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, स्वाभिमानीच्या आक्रमक आंदोलनामुळे जागतिक दर्जाच्या मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने इतर बियाणे कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा भारतातील पहिलीच घटना असावी. या आंदोलनात मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे यांच्यासमवेत बुलडाणा जिल्हाध्यक्ष भगवान मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नितीन राजपूत, राम अंभोरे, अनिल वाकोडे, शे. मुक्तार, संतोष परिहार, प्रशांत जयवाळ, बाबुराव गरूड, रामेश्‍वर परिहार, प्रमोद इंगळे, नवलसिंग मोरे, सुभाष घाडगे, रमेश शिरसाट, सदानंद पाटील, अशोक सोनाळकर, ज्ञानेश्‍वर काटकर, सुरेश जाधव, सुरशे गाडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.       

नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - रविकांत तुपकरबीटीचे मूळ तंत्नज्ञान हे मोंन्सेंटो कंपनीने विकसित केले आहे व भारतात हे तंत्नज्ञान मोन्सॅन्टो कंपनीनेच आणले आहे. त्यामुळे बोंडअळीने शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीला मोन्सॅन्टो कंपनीच जबाबदार आहे. हे तंत्नज्ञान विकसित करताना मोन्सॅन्टो कंपनीने बीटीवर कुठलेही अळीचे आक्र मण होणार नाही व प्रती एकर १५ ते २0 क्विंटल उत्पादन निघेल, अशी हमी दिली होती; परंतु प्रत्यक्षात बोंडअळीने आक्रमण केल्यावर आंतरराष्ट्रीय मोन्सेंटो कंपनीने शेतकर्‍यांवरच खापर फोडून हात वर केले; मात्न स्वाभिमानीने आक्रमक आंदोलने करीत हा प्रश्न लावून धरला आहे त्यामुळेच गुन्हे दाखल होत आहे; मात्र एवढय़ाने प्रश्न सुटणार नाही. मोन्सॅन्टो कंपनीला सरकार पाठीशी घालत आहे. या कंपनीने शेतकर्‍यांकडून घेतलेली रॉयल्टी व नुकसान भरपाई वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकर