चार शेतकºयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:49 IST2017-08-01T00:42:05+5:302017-08-01T00:49:13+5:30

संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील चार शेतकºयांनी ८५ क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून व वजनकाटा पावती हरविल्याचे सांगून खविसंच्या रोखपालाकडून ४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश रोखपालाकडून नेऊन फसवणूक केल्याची तक्रार खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी तामगाव पोलिसात ३० जुलै रोजी ८ वा. दिली आहे.

Cheating Offense Against Four Farmers | चार शेतकºयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

चार शेतकºयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ठळक मुद्देतूर खरेदी-विक्री प्रकरणखविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी दिली तामगाव पोलिसात तक्रार४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश नेऊन फसवणूक केल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील चार शेतकºयांनी ८५ क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून व वजनकाटा पावती हरविल्याचे सांगून खविसंच्या रोखपालाकडून ४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश रोखपालाकडून नेऊन फसवणूक केल्याची तक्रार खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी तामगाव पोलिसात ३० जुलै रोजी ८ वा. दिली आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आवार येथील चार शेतकºयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आवार येथील एकनाथ रामचंद्र दुतोंडे, अशोक भिकाजी दुतोंडे, अविनाश संजय दुतोंडे, योगेश शालीग्राम अहिर या चार शेतकºयांनी एकूण ८५-५० क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून वजन काटा पावती हरविल्याचे सांगून व तसा लेखी अर्ज देऊन धनादेश देण्याची विनंती रोखपाल गवई यांच्याकडे केली. त्यामुळे शेतकरी अविनाश संजय दुतोंडे यांच्या नावाचे धनादेश क्र.१८९७६ व १८९७७७ क्रमांकाचा रुपये २ लाख १७ हजार १५० व २ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा संग्रामपूरचे धनादेश दिलेत व याची पोच म्हणून गवई यांनी शेतकरी दुतोंडे यांनी अशी कोणतीही तूर विक्री १० मे २०१७ रोजी केली नसल्याचे नंतर चेकबुक व वजन मापाचे अवलोकन केले असल्याचे रोखपाल गवई यांच्या लक्षात आले. याच एका शेतकºयाने पुन्हा १७ मे २०१७ रोजी विक्री केलेल्या तुरीचे सहा धनादेश रोखण्याचे पत्र स्टेट बँकेला दिले. वरील चार शेतकºयांनी संगनमत करून संस्थेची ४ लाख ३१ हजार ७५७ रुपयांनी फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आवार येथील एकनाथ रामचंद्र दुतोंडे, अशोक भिकाजी दुतोंडे, अविनाश संजय दुतोंडे, योगेश शालीग्राम अहिर यांच्याविरुद्ध अप.नं.१३४/१७ कलम ४२०, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस. अवचार पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.

Web Title: Cheating Offense Against Four Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.