शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

बुलडाण्यात घुमतोय 'स्वच्छ भारत का ईरादा'चा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:32 IST

बुलडाणा: विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने आता पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने आता पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य मंत्र्याच्या कारवाईच्या अल्टीमेटमचा पालिकेने धसका घेतला असून शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने नवनविन प्रयोग आजमाविण्यात येत आहेत. बुलडाण्यात आता  स्वच्छ भारत का ईरादा  असे गीत वाजवित कचरा गोळा करण्यात येत असून, गाण्याच्या अवाजाने कचरा गाड्या बुलडाणेकरांचे लक्षवेधत आहेत.बुलडाणा शहरातील स्वच्छता, डेंग्यूची साथ, पाणी प्रश्न यासारख्या अनेक मुद्दयावर बुलडाणा नगर पालिकेने आवश्यक त्या उपायायोजना न केल्यास बुलडाणा पालिका प्रशासनाविरोधात गंभीर कारवाईचा अल्टीमेटमच राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मागील महिन्यात दिला होता. बुलडाणा पालिकेचा प्रश्न विधीमंडळाच्या दालनातही गाजला. या अल्टीमेटची बुलडाणा पालिकेने धास्ती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ह्यस्वच्छ भारत अभियानह्ण राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलडाणा पालिकेने आता स्वच्छतेवर वाजणाऱ्या गाण्यांची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा गोळा करणाºया गाड्यांवर ह्यस्वच्छ भारत का ईरादा कर लिया हमने!ह्ण असे गीत वाजविले जात आहे. सकाळी-सकाळी कचरा गोळा करायला आलेल्या गाडीवर हे गाणे ऐकताच सर्वांचेच याकडे लक्ष जात आहे. या गीतामुळे कचरा गोळा करण्यास चांगलीच मदत होत आहे. शहरात जवळपास २५ पेक्षा जास्त गाड्या सध्या फिरत असून यामध्ये काही नविन गाड्या वाढविल्याची माहिती आहे. बुलडाणा पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग राबविण्यात येत असून, स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे, लवकरच समोर येईल. बुलडाणा पालिकेचा कचरा वारंवार चर्चेतस्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. मात्र बुलडाणा पालिका गेल्या दोन महिन्यापासून कचºयाच्या बाबतीत वारंवार चर्चेत येत असल्याचे दिसून येते. मागील महिन्यात स्वच्छेतचा प्रश्न आरोग्य मंत्र्यांपर्यंत गेला, तर काही विरोधकांनी चक्क पालिकेच्या आवारातच प्रभागातील कचरा टाकला होता. शहरात कचरा कुंड्यांची गरजपूर्वी बुलडाणा शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या त्या ठिकाणी कचरा कुंड्या नसल्याने अनेक नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. परिणामी, काही ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याचे चित्र आहे. घंटा झाली बंद!सकळच्या सुमारास घरासमोर घंटा वाजली की, प्रत्येकजण कचरागाडी आली, असे समजून जायचे. काही वर्षापासून राज्यभरातील नगर पालिकांकाडून कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू केले आहेत. मात्र बुलडाण्यात आता घंटा वाजवित येणाºया गाडीवर आता स्वच्छतेचे गीत ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान