शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बुलडाणा जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटरने खालावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:08 IST

बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा विचार करता ती ही झपाट्याने कमी होत असून, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात ती घटली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेर अडीच मीटर खोल जाण्याची भीती टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार

सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा विचार करता ती ही झपाट्याने कमी होत असून, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात ती घटली आहे.त्यामुळे मार्च अखेर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्ह्यातील ७४८ गावात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, जिल्हाधिका-यांनी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळी सवलतीचा अर्ध्या जिल्ह्याला फायदा होणार असला तरी पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ८८ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे १८ लाख लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न येत्या काळात जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने सोडवावा लागणार आहे.वार्षिक सरासरीच्या १०७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी ओढ देत हा पाऊस आल्याने आॅक्टोबर अखेर अपेक्षित अशी भूजलपातळी यंदा गाठल्या गेली नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच गेल्या पाच वर्षाचा विचार करता २०१३ मध्ये वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी ही सरासरीमध्ये ०.३९ मीटर दाखवत असली तरी उपरोक्त चार तालुक्यात त्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदा ही भूजल पातळी दीड मीटरने खालावली असून, मार्च अखरे ही पाणी पातळी अडीच मीटरने आणखी खोल जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.परिणामी जिल्ह्यातील १०१ पेक्षा अधिक गावांवर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होणार यात शंका नाही. ग्रामीण पाणीपुरव्याची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही अवघा १२ टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक आहे. 

सिंदखेडराजा तालुक्यालाही फटका! सिंदखेडराजा तालुक्याची भूजल पातळी ही जानेवारीमध्येच गत वर्षीच्या तुलनेत २.३१ मीटरने खोल गेली आहे. मलकापूर तालुक्याचीही २.०१ मीटरने ती खालावली असून, लोणार तालुक्याचीही १.७० मीटरने पाणी पातळी खालावली आहे. गेल्या तीन वर्षापूर्वीच घसरलेल्या भूजल पातळीमुळे जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात विंधन विहिरी घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यात आता लोणार तालुक्याचीही प्रसंगी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याची सध्याची भूजल पातळी ही दीड मीटरने खालावलेली असून, १६७ निरीक्षण विहिरींची पाहणी करून ती काढण्यात आली आहे. मार्च अखेर पुन्हा त्यात घट होण्याची शक्यता आहे.

खामगाव तालुक्यातील चार नळ योजनांची दुरुस्ती पाणीटंचाई निवारणार्थ खामगाव तालुक्यातील खौलखेड, वाडी, घाटपुरी व कोक्ता या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. अन्य योजनांतून या कामासाठी या गावांना निधी भेटलेला आहे किंवा नाही, याची तपासणी करूनच ही कामे करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचित केले आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्याचा टंचाई आराखडा हा १९ कोटी रुपयांचा असून, सध्या टंचाई निवारणासाठी विहीर अधिग्रहणावर प्रशासनासह गावांची भिस्त आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा