शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याबाबत बुलडाणा जिल्हा संवेदनशील; १६ ठिकाणे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:12 IST

बुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे.

ठळक मुद्देअवैध वृक्षतोड, चराईची वाढती संख्या पाहता मानव वन्यश्वापदे हा संघर्ष वाढत आहे. १७ वर्षाचा इतिहास पाहता १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर वन्यश्वापदांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दशकांचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू अशा घटनात होत असल्याचे स्पष्ट होते.

- नीलेश जोशीबुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने असा संघर्ष रोखण्यासाठी पथके सज्ज केली आहेत.जिल्ह्याचे नऊ टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले असतानाच त्याची घनता ही सुमारे ०.४ टक्क्यांच्या आसपास आली आहे. एक हजार १६६ चौरस किमी क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे. त्यातच अवैध वृक्षतोड, चराईची वाढती संख्या पाहता मानव वन्यश्वापदे हा संघर्ष वाढत आहे. जिल्ह्याचा गेल्या १७ वर्षाचा इतिहास पाहता १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर वन्यश्वापदांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी वनविभाग असे संघर्ष रोखण्यासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव विभाग सज्ज झाला आहे.जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि राज्यातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य लोणार सरोवर परिसरात शेड्यूल वन मधील बिबट्याचा वावर वाढला आहे. पशुधनासह मानवावरही हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने वनविभागाने जुन्या अनुभवावरून सतर्कता बाळगण्याची भूमिका घेतली आहे. दोन दशकांचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू अशा घटनात होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप जिल्ह्यातील जंगलात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या ३०० वर्षाच्या काळात बिबट्याने त्याची आश्रयस्थाने बदलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाही परिणाम यावर होत आहे. वनांची घनताही कमी होत असून वन जमीनीवर अतिक्रमण वाढण्यासोबतच वृक्षतोड, गुरे चराईसाठी वनालगतच्या गावातील नागरिक जंगलात जात असल्याने हा संघर्ष येत्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत.हे पट्टे आहेत संवेदनशीलबुलडाणा जिल्ह्यात वन्यश्वापदे आणि मानव संघर्षाच्या दृष्टीने मोताळा तालुक्यातील नेहरूनगर, धामणगाव बढे, बुलडाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, गुम्मी धाड, मेहकरमधील घाटबोरी, चिखलीमधील ढासाळा, अंचरवाडी, इसरूळ, खामगाव तालुक्यातील वरणा, मांडणी, केंद्री, काळगाव,निमकव्हाळा, अंबाबरवा अभयारण्यालगतचा भाग, जळगाव जामोद तालुक्यातील काही भाग प्रामुख्यान संवेदनशील गणला जातो. याच भागत पूर्वी संघर्ष झालेले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव