शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याबाबत बुलडाणा जिल्हा संवेदनशील; १६ ठिकाणे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:12 IST

बुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे.

ठळक मुद्देअवैध वृक्षतोड, चराईची वाढती संख्या पाहता मानव वन्यश्वापदे हा संघर्ष वाढत आहे. १७ वर्षाचा इतिहास पाहता १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर वन्यश्वापदांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दशकांचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू अशा घटनात होत असल्याचे स्पष्ट होते.

- नीलेश जोशीबुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने असा संघर्ष रोखण्यासाठी पथके सज्ज केली आहेत.जिल्ह्याचे नऊ टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले असतानाच त्याची घनता ही सुमारे ०.४ टक्क्यांच्या आसपास आली आहे. एक हजार १६६ चौरस किमी क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे. त्यातच अवैध वृक्षतोड, चराईची वाढती संख्या पाहता मानव वन्यश्वापदे हा संघर्ष वाढत आहे. जिल्ह्याचा गेल्या १७ वर्षाचा इतिहास पाहता १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर वन्यश्वापदांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी वनविभाग असे संघर्ष रोखण्यासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव विभाग सज्ज झाला आहे.जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि राज्यातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य लोणार सरोवर परिसरात शेड्यूल वन मधील बिबट्याचा वावर वाढला आहे. पशुधनासह मानवावरही हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने वनविभागाने जुन्या अनुभवावरून सतर्कता बाळगण्याची भूमिका घेतली आहे. दोन दशकांचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू अशा घटनात होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप जिल्ह्यातील जंगलात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या ३०० वर्षाच्या काळात बिबट्याने त्याची आश्रयस्थाने बदलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाही परिणाम यावर होत आहे. वनांची घनताही कमी होत असून वन जमीनीवर अतिक्रमण वाढण्यासोबतच वृक्षतोड, गुरे चराईसाठी वनालगतच्या गावातील नागरिक जंगलात जात असल्याने हा संघर्ष येत्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत.हे पट्टे आहेत संवेदनशीलबुलडाणा जिल्ह्यात वन्यश्वापदे आणि मानव संघर्षाच्या दृष्टीने मोताळा तालुक्यातील नेहरूनगर, धामणगाव बढे, बुलडाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, गुम्मी धाड, मेहकरमधील घाटबोरी, चिखलीमधील ढासाळा, अंचरवाडी, इसरूळ, खामगाव तालुक्यातील वरणा, मांडणी, केंद्री, काळगाव,निमकव्हाळा, अंबाबरवा अभयारण्यालगतचा भाग, जळगाव जामोद तालुक्यातील काही भाग प्रामुख्यान संवेदनशील गणला जातो. याच भागत पूर्वी संघर्ष झालेले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव