शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

बुलडाणा जिल्ह्यातून वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता, ३३५ जणांना शोधण्यास पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:27 PM

खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्या. डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

- भगवान वानखेडे खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यापैकी ३३५ व्यक्ती मिळाल्याची सकारात्मक बाब जरी समोर येत असली तरी मात्र डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.घरी कुणालाच काही न सांगता शौचास जातो म्हणुन निघून जाणे, शेतात गेला आणि पुन्हा परतलाच नाही, मित्रांक डे, नातेवार्इंकाडे गेला होता पण आढळून आला नाही अशा अनेक तक्रारी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक पोलिस स्टेशनला तक्रारी देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही संख्या जिल्ह्यातील सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.डिसेंबर महिन्यात तब्बल ९० व्यक्ती बेपत्तामागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एकाच महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता होणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावणारे आहे. वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता जरी झाल्या असल्या तरी ३३५ व्यक्ती शोधण्यात पोलिसांना यश आहे. यापेक्षाही अधिक व्यक्ती घरी परतलेल्या असतात परंतु हरवल्याची तक्रार दिली जाते परंतु घरी परत आल्याची माहिती दिली जात नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे.आॅपरेशन मुस्कान लाभदायीपोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला आॅपरेशन मुस्कान राबवण्यात येत आहे. यासाठी एक विशेष पथक ही तयार करण्यात आले आहे. या पथकाला बेपत्ता व्यक्ती शोधण्यात येत असून आगामी काळात हे आॅपरेशन आणखीन गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कुटूंबातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पटकन दिली जाते, परंतु त्या तुलनेत मात्र आढळून आल्याची माहिती पोलिस स्टेशनला दिली जात आहे. मात्र नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रारीबरोबरच आढळून आल्याची माहितीही द्यावी.-संदिप डोईफोडे, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस