शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:24 IST

बुलडाणा : मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. अनुसूचित जमातीचे (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देसरकार सत्तेवर येऊन जवळपास चार वर्ष लोटली तरीही आरक्षणाच्या संदर्भात ठोस कार्यवाही केली नाही. १३ आॅगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात करण्यात आले. तबला, पेटी, खंजेरीच्या आवाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संगितमय झाला होता.

बुलडाणा : मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. अनुसूचित जमातीचे (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती द्याव्यात याकरिता समस्त धनगर समाजाचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वास्तविक देशाच्या सर्वोच्च घटनेने धनगर समाजास आरक्षण दिलेले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख घटनेच्या परिशिष्ट दोनमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ नुसार केलेला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे धनगर समाजास आरक्षणाच्या सोयी सवलती मिळणे आवश्यक आहे. परंतू राज्य शासनाने यासंदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याने धनगर समाज मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे. न्याय मागण्यांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. परंतू राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताच कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजस आरक्षणाच्या सवलती देण्याविषयी केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी बारामती येथे केली होती. मात्र सरकार सत्तेवर येऊन जवळपास चार वर्ष लोटली तरीही आरक्षणाच्या संदर्भात ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे. त्याअनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे देण्यात करण्यात आले.

महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या धनगर समाजाच्या धरणे आंदोलनात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील महिलांनी सकाळपासूनच आंदोलनस्थळी हजेरी लावली. पावसाचे वातावरण असतानाही मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी येळकोट, येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणा दिल्या.

भजनी मंडळांचा सहभाग

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी सुुरु असलेल्या धरणे आंदोलनात समाजातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला. एकापेक्षा एक भजन सादर करुन भजनी मंडळांनी आंदोलनात रंगत आणली. झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी भजने सादर करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तबला, पेटी, खंजेरीच्या आवाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संगितमय झाला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयagitationआंदोलन