शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

बुलडाणा: वृक्षारोपणासाठी ९५ लाखावर खड्डे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:36 IST

जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाच्या ३३ कोटी वृक्षारोपणाच्या उपक्रमास १ जुलैपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात ९५.४६ लाख खड्डे करण्यात आले आहेत.वृक्ष लागवड मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान वन महोत्सव साजरा होणार आहे. हरित चळवळ बनलेल्या या मोहिमेत सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यावा, सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्याकडून रोपे मिळवून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वृक्ष लागवडीसाठी उद्दिष्टापेक्षा जास्त ९५ लाख ४६ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टामध्ये वन विभाग २६ लाख ७४ हजार, सामाजिक वनीकरण १८ लाख २० हजार, ग्रामपंचायत १६.६६ लाख व इतर प्रशासकीय यंत्रणा ३३.८६ लक्ष उद्दिष्टाचा समावेश आहे. सन २०१९-२० मध्ये शासन निर्णयानुसार सवलतीच्या दरात ३० सप्टेंबर पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे पुरविण्यात येणार आहे.वन महोत्सवासाठी रोपवाटिका सज्ज

  • १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान महाराष्ट्रात वन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
  •  ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग घेण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथील रोपवाटिकेत ८० हजार उंच रोपे व १ लाख ५० हजार लहान रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
  •  ही रोपे लागवडीसाठी तयार असून, बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी ती लावून पर्यावरण संवर्धनात त्यांचा मोठा सहभाग असेल.
  •  लावलेल्या झाडांच्या संवर्धन व संरक्षणासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे.

पर्यावरण समतोल राखणारी हरित चळवळ४वृक्षारोपणाची ही हरित चळवळ आहे. ज्यामध्ये पर्यावरण समतोल राखणाऱ्या या चळवळीमध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, खासगी व्यापारी संस्था, बँका व खासगी कंपन्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन वृक्षारोपण करावे. घराच्या परिसरात, खुली जागा असेल तिथे, कार्यालय, शाळा, महाविद्यालये परिसर, खासगी कंपनी परिसर व वैयक्तिक स्तरावर वृक्षारोपण करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentवातावरण