शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बुलडाणा:  खरीप अंतीम पैसेवारी ४३ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:17 IST

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सातत्याने अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाने सतावल्याचे स्पष्ट होत असून जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ही अवघी ४३ पैसे आली आहे. ५० पैशाच्या आत ती असल्याने शेतकºयांच्या आणखी काही नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.चालू दशकात २०१३-१४ या वर्षाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षणाची स्थिती आहे. त्यात यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र परतीचा व अवकाळी पावसामुळे चांगले उत्पादन होण्याच्या पल्लवीत झालेल्या शेतकºयाच्या आशेवर पाणी फेरले होते. जिल्ह्यातील सहा लाख ४९ हजार ३५१ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात या पावसामुळे ५५९ कोटी ६४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना त्वरनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत होती. दरम्यान राज्य शासनाने यापैकी १३६ कोटी १३ लाख रुपये पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला दिले होते. त्याच्या वाटपानंतर जिल्ह्याला दुसºया टप्प्यात जिल्ह्याला २९७.४८ कोटी रुपये मिळाले होते. त्याची सध्या तालुकास्तरावरून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही जिल्ह्याला १२६ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.अशातच जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषामुळे यात काही प्रसंगी काही अडचणीही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली होती. ती त्यावेळी ७२ पैसे आली होती. मात्र त्यानंतर आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. त्यातच ३१ आॅक्टोबरला जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आली होती. खरीपामध्ये जिल्ह्यात यावर्षी सात लाख ३९ हजार ८६७ हेक्टरवर पेरा झाला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे हातोंडाशी आलेले पिक हातून गेले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी