शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

बुलडाणा:  खरीप अंतीम पैसेवारी ४३ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:17 IST

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सातत्याने अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाने सतावल्याचे स्पष्ट होत असून जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ही अवघी ४३ पैसे आली आहे. ५० पैशाच्या आत ती असल्याने शेतकºयांच्या आणखी काही नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.चालू दशकात २०१३-१४ या वर्षाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षणाची स्थिती आहे. त्यात यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र परतीचा व अवकाळी पावसामुळे चांगले उत्पादन होण्याच्या पल्लवीत झालेल्या शेतकºयाच्या आशेवर पाणी फेरले होते. जिल्ह्यातील सहा लाख ४९ हजार ३५१ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात या पावसामुळे ५५९ कोटी ६४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना त्वरनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत होती. दरम्यान राज्य शासनाने यापैकी १३६ कोटी १३ लाख रुपये पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला दिले होते. त्याच्या वाटपानंतर जिल्ह्याला दुसºया टप्प्यात जिल्ह्याला २९७.४८ कोटी रुपये मिळाले होते. त्याची सध्या तालुकास्तरावरून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही जिल्ह्याला १२६ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.अशातच जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषामुळे यात काही प्रसंगी काही अडचणीही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली होती. ती त्यावेळी ७२ पैसे आली होती. मात्र त्यानंतर आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. त्यातच ३१ आॅक्टोबरला जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आली होती. खरीपामध्ये जिल्ह्यात यावर्षी सात लाख ३९ हजार ८६७ हेक्टरवर पेरा झाला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे हातोंडाशी आलेले पिक हातून गेले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी