शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बुलडाणा : कंत्राटी कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात; आंदोलनाचा इशारा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:28 AM

बुलडाणा:   कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन लाखाहून अधिक कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात शासनाच्या १४ विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देनवीन निर्णय अन्यायकारक ३ लाख कर्मचार्‍यांची अडचण

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:   कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन लाखाहून अधिक कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात शासनाच्या १४ विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.शासनाच्या विविध विभागात मोठय़ा प्रमाणात कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर व विविध प्रकारची कामे सन १९९५-९६ पासून करीत आहेत. अशा कर्मचार्‍यांची संख्या राज्यात जवळपास तीन लाखाहून जास्त आहे. त्यांच्याकडून शासन १२ महिन्याचा करार करून घेत होती, तर कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी न्यायालयात केले होते. दरम्यान, शासनाकडून कंत्राटी कर्मचार्‍यांचा ११ महिन्यांचा करार करण्यात आला. तर काही विभागातील कर्मचार्‍यांचा ६ महिन्यांचा करार करण्यात आला; मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांकडून नियमित कर्मचार्‍यांपेक्षा जास्त कामे करून घेण्यात येत असूनही त्यांना नियमित कर्मचार्‍यांपेक्षा ३0 ते ४0 टक्के कमी मानधन देण्यात येत आहे. या अन्यायाविरुद्ध व कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित नियुक्ती देण्याचा मागणीसाठी कंत्राटी कर्मचार्‍यांच्या विविध संघटनेतर्फे मागणी होऊ लागली. मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी २0१८ रोजी शासन निर्णयाचा आध्यादेश काढून राज्यातील तीन लाखाहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांचा व्यावसायिक भवितव्याबाबत घेतलेला अन्यायकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, सदर शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणी लवकरच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहे. कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

या विभागातील कर्मचार्‍यांचा समावेशकंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, वसुंधरा पाणलोट विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलस्वराज, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, भूजल विभाग,  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना यांचा समावेश आहे.

शासनाने ९ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आयोजित आंदोलनात सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे.- रवींद्र राऊत जिल्हाध्यक्ष, सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा