शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: शेतकऱ्यांचा कृषी कार्यालयात आठ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:31 IST

दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या रात्री नऊ वाजले तरी सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गतवर्षी आसमानी संकटाने सोयाबीनला फटका बसल्यानंतर यंदा बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकºयानी २९ जुलै रोजी थेट कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला असून जो पर्यंत दोषी कंपनीवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत कार्यालय न सोडण्याचा इशारा दिला आहे. दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या रात्री नऊ वाजले तरी सुरू होता.जिल्ह्यात तब्बल ५२७ शेतकºयांचे ६१७ हेक्टरवरील सोयाबीनच उगवले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात प्रकरणी कारवाई करून शेतकºयांना नुकसान भरपाई २९ जून रोजीच द्यावी, अशी जोरकस मागणी या शेतकºयांनी लावून धरली होती. त्यामुळे २९ जून रोजी दिवसभर कृषी अधीक्षक कार्यालयात चांगलीच धावपळ सुरू होती.दरम्यान, शेतकºयांना प्रती हेक्टरी बियाणे व मजुरी, खताचा वाया गेलेला खर्च पाहता किमान दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी लावून धरली आहे. जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. प्रसंगी शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास संबंधीत कंपनीचे गोडावूनच जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर बियाणे कंपन्यांनी व महाबीजने विक्री केलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी चिखली येथील एका कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यात शेतकºयांना न्याय मिळण्याच्या ऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता, असा रविकांत तुपकर यांनी केला आहे. दरम्यान शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. मात्र आठ दिवसानंतरही त्यादृष्टीने पावले उचलल्या गेली नाहीत. परिणामी संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय गाठून तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकºयांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात २९ जून रोजी दुपारी ठिय्या मांडला, तो रात्री नऊ वाजेपर्यंतही सुरू होता.सोयाबीन पीकाची पेरणी करूनही उगवत नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तातडीने आर्थीक मदत किंवा दर्जेदार बियाणे देण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकरी करीत आहेत.कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल कराकथितस्तरावर निकृष्ट बियाणे देणाºया कंपन्यांकडून शेतकºयांना बियाण्याच्या रकमेसह, खत, मजुरीचा खर्च अशी नुकसान भरपाई द्यावी, सोबतच संबंधित कंपन्याविरोधात त्वरित गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करत प्रसंगी कंपनीचे गोडावूनच जाळण्याचा इशारा शेतकºयांनी यावेळी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagitationआंदोलन