शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

बुलडाणा: शेतकऱ्यांचा कृषी कार्यालयात आठ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:31 IST

दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या रात्री नऊ वाजले तरी सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गतवर्षी आसमानी संकटाने सोयाबीनला फटका बसल्यानंतर यंदा बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकºयानी २९ जुलै रोजी थेट कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला असून जो पर्यंत दोषी कंपनीवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत कार्यालय न सोडण्याचा इशारा दिला आहे. दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या रात्री नऊ वाजले तरी सुरू होता.जिल्ह्यात तब्बल ५२७ शेतकºयांचे ६१७ हेक्टरवरील सोयाबीनच उगवले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या औरंगाबाद येथील एका कंपनीविरोधात प्रकरणी कारवाई करून शेतकºयांना नुकसान भरपाई २९ जून रोजीच द्यावी, अशी जोरकस मागणी या शेतकºयांनी लावून धरली होती. त्यामुळे २९ जून रोजी दिवसभर कृषी अधीक्षक कार्यालयात चांगलीच धावपळ सुरू होती.दरम्यान, शेतकºयांना प्रती हेक्टरी बियाणे व मजुरी, खताचा वाया गेलेला खर्च पाहता किमान दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी लावून धरली आहे. जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. प्रसंगी शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास संबंधीत कंपनीचे गोडावूनच जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर बियाणे कंपन्यांनी व महाबीजने विक्री केलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी चिखली येथील एका कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यात शेतकºयांना न्याय मिळण्याच्या ऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता, असा रविकांत तुपकर यांनी केला आहे. दरम्यान शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची तयारी या कंपनीने दाखवली होती. मात्र आठ दिवसानंतरही त्यादृष्टीने पावले उचलल्या गेली नाहीत. परिणामी संतप्त झालेल्या शेतकºयांनी थेट कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय गाठून तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकºयांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात २९ जून रोजी दुपारी ठिय्या मांडला, तो रात्री नऊ वाजेपर्यंतही सुरू होता.सोयाबीन पीकाची पेरणी करूनही उगवत नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तातडीने आर्थीक मदत किंवा दर्जेदार बियाणे देण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकरी करीत आहेत.कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल कराकथितस्तरावर निकृष्ट बियाणे देणाºया कंपन्यांकडून शेतकºयांना बियाण्याच्या रकमेसह, खत, मजुरीचा खर्च अशी नुकसान भरपाई द्यावी, सोबतच संबंधित कंपन्याविरोधात त्वरित गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करत प्रसंगी कंपनीचे गोडावूनच जाळण्याचा इशारा शेतकºयांनी यावेळी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagitationआंदोलन