शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुलडाणा : दुष्काळाच्या मुद्यावर जिल्ह्यात संभ्रम; राज्य शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:46 IST

बुलडाणा : केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेंतर्गत यावर्षी कृषी अधीक्षक कार्यालयाने नव्या निकषानुसार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती नसल्याचा अहवाल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान पुणे कृषी आयुक्तालयाला पाठविलेला असतानाच ३१ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यांची पैसेवारी ही ५0 पैशांच्या आत आली आहे. त्यामुळे हे सातही तालुके दुष्काळसदृश स्थितीत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देघाटाखालील सात तालुक्यातील पैसेवारी ५0 पैशांच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेंतर्गत यावर्षी कृषी अधीक्षक कार्यालयाने नव्या निकषानुसार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती नसल्याचा अहवाल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान पुणे कृषी आयुक्तालयाला पाठविलेला असतानाच ३१ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यांची पैसेवारी ही ५0 पैशांच्या आत आली आहे. त्यामुळे हे सातही तालुके दुष्काळसदृश स्थितीत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रश्नी प्रशासकीय पातळीवर कोणता निर्णय घेतल्या जातो, याकडे लक्ष लागले असून, प्रशासनही राज्य शासनाच्या निर्देशाच्या प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामस्वरूप दुष्काळाच्या मुद्यावर जिल्ह्यात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.खरिपाची अंतिम पैसेवारी ही ५५ पैसे आली आहे. खरिपाची घाटाखालील मलकापूर (४७ पैसे), मोताळा (४८), नांदुरा (४८), खामगाव (४६), शेगाव (४५), जळगाव जामोद (४५), संग्रापूर (३९) या प्रमाणे पैसेवारी आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याची पैसेवारी ही ५५ पैसे आली आहे. यामध्ये घाटावरील बुलडाणा (७४), चिखली ६३, देऊळगाव राजा (५४), मेहकर (६७), लोणार (६२), सिं.राजा (६३) या प्रमाणे अंतिम पैसेवारी आली आहे. त्यामुळे घाटाखालील तालुके दुष्काळसदृश स्थितीमध्ये मोडत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेंतर्गत यावर्षीपासून नवीन निकष लागू झाले आहे. त्यानुसार पर्जन्यमान, कृषी निर्देशांक, मृद्रा आद्र्रता आणि रिमोट सेंसिंगद्वारे  घेण्यात आलेल्या डाटाच्या आधारावर  हा बुलडाणा जिल्ह्याचा दुष्काळासंदर्भातील अहवाल साधारण आला होता. जिल्हा दुष्काळाच्या निकषात बसला नव्हता.  पावसाचा खंडही यात विचारात घेतला होता. सप्टेंबर अखेर मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा या तालुक्यात नव्या निकषांपैकी एकच निकष नकारात्मक आला होता. किमान दोन निकष नकारात्मक अपेक्षित  होते. तसे न झाल्यामुळे दुष्काळासंदर्भातील स्थिती जिल्ह्यात नसल्याचे स्पष्ट झाले होते. यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने त्यांचा अहवाल पुणे येथील कृषी आयुक्तालयाला पाठविला होता. दुसरीकडे  ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली होती. घाटाखालील ६४२ गावांमध्ये पैसेवारी ५0 च्या  आत आहे.

निर्देशाची प्रतीक्षाकेंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेसंदर्भाने नव्या निकषानुसार कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने अहवाल पाठवला आहे. सोबतच पैसेवारीही डिसेंबर अखेर जाहीर झाली आहे. यासंदर्भात दुष्काळ जाहीर करण्याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट असे निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्याची जिल्हा प्रशासनास प्रतीक्षा आहे. त्यानंतरच या विषयावर स्पष्टपणे बोलता येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. पैसेवारी कमी असलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांचा सामान्य जमीन महसूल माफ होईल का? यांसह अनेक प्रश्न यामुळे जनमानसात निर्माण झाले आहेत. प्रत्यक्ष यासंदर्भात राज्यशासनाची भूमिका काय राहते, यावर पुढील गोष्टी अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती