बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर!
By Admin | Updated: March 18, 2017 01:10 IST2017-03-18T01:10:14+5:302017-03-18T01:10:14+5:30
८५ हजार शेतकरी; १७0४ कोटी कर्जाचे ओझे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर!
नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. १७- गत चार वर्षांचा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकर्यावर कर्जाचा बोजा वाढला असून, जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्यांवर १७0४ कोटींचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. भविष्यात हे कर्ज माफ व्हावे, अशी अपेक्षा आता बळीराजाकडून व्यक्त होत आहे.
सततची नापिकी, दुष्काळ आणि दरातील अभावामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणखीनच उद्ध्वस्त झाला. गत दिडवर्षात जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारी स्थितीमुळे १२२ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. शेतकर्यांवरील कर्जाचा डोंगर कमी व्हावा,यासाठी सध्या लोकप्रतिनिंधीकडून कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. शेतकरी कर्जमाफीचा हा निर्णय घ्यायचा झाल्यास शासनाच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडू शकतो, याची आकडेमोड सुरू आहे. आता कर्जमाफी व्हावी,अशी अपेक्षा बळीराजाकडूनही व्यक्त होत आहे.
१७0४ कोटीचे पीक कर्ज थकले!
जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्यांकडे तब्बल १७0४ कोटी रुपयाचे कर्ज थकले आहे. यात खरीपातील १ लाख १0 हजार शेतकरी व रब्बीतील ७४ हजार ५00 शेतकर्यांना समावेश आहे. जिल्हा केंद्रीय बँकेकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा सहकारी बँकेचे ३४२ कोटी आणि सर्व राष्ट्रीय बँका व ग्रामीण बँका यांचे १३६२ कोटीचे पिककर्ज थकले आहे.
वर्षभरात २१७ शेतकरी आत्महत्या
सततची नापिकी व वाढण्यार्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून वर्षभरात बुलडाणा जिल्ह्यात २१७ शेतकर्यांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापैकी नापिकीमुळे ६१ आणि कर्जबाजारीपणातून ६१ अशा १२२ शेतकर्यांची आत्महत्या केल्याची नोंद शासणदरबारी आहे.
यंदा वाटले १0६२ कोटीचे पीक कर्ज !
२0१६-१७ खरीप आणि रब्बी हंगामात विविध बँकाकडून जिल्ह्यातील जवळपास १ लाख ६५ हजार ३३८ शेतकर्यांना १0६२ कोटी रुपयाचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. यात खरीपासाठी १ लाख ४७ हजार ६७५ शेतकर्यांना ९८६.२१ कोटी आणि रब्बीसाठी १७ हजार ६६३ शेतकर्यांना ७६.१८ कोटीचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.