शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बुलडाणा : शेतकर्‍यांद्वारा केळवद येथील महावितरणच्या कार्यालयात जाळपोळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 1:28 AM

चिखली: ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची जाळपोळ केली. दरम्यान, हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

ठळक मुद्देराहुल बोंद्रे यांच्या आक्रमकतेने खंडित विद्युत पुरवठा झाला पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्‍यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची जाळपोळ केली. दरम्यान, हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता पाहता विद्युत वितरणने तातडीने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.महावितरणच्या केळवद कार्यालयांतर्गत असलेल्या केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, गिरोला, हातणी या गावातील शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता पाच दिवसांपासून खंडित केला होता. यामुळे या गावातील ऐन भरात आलेले गहू, हरभरा, तूर, मका, कांदा व भाजीपाल्याची पिके धोक्यात आली होती. तर उपरोक्त गावातील अनेक शेतकर्‍यांनी वीज बिल भरले असून, काहींना बिलेदेखील मिळालेली नाहीत, असे असताना महावितरणने अचानकपणे सरसकट कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने उपरोक्त गावातील शेतकर्‍यांनी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील कार्यालयावर धडक दिली असता तेथे कोणताही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, उशिराने येथे बुलडाणा येथून कार्यकारी अभियंता रामटेके उपस्थित झाले खरे; मात्र त्यांच्याकडूनही शेतकर्‍यांना दिलासा न मिळाल्याने शेतकर्‍यांनी संतापाच्या भरात केळवद येथील कार्यालयास आग लावली. दरम्यान, आ. बोंद्रे यांनी जोपर्यंत शेतकर्‍यांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत एकाही अधिकारी, कर्मचार्‍यांना येथून हलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यकारी अभियंता रामटेके यांच्या सूचनेवरून खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी आ. बोंद्रे यांच्यासह संजय पांढरे, पं.स. सदस्य प्रभाकर वाघ, धाड सरपंच रीझवान सौदागर, रमेश सुरडकर, सरपंच निंबाजी सवडे, संजय गिरी, पिंटू गायकवाड, बाळू साळोख, राम जाधव, समाधान शेळके, नामदेव सदार, दीपक जाधव, दिलीप सुसर, अरुण शेळके, अशोक वानखेडे, संजय बाहेकर, भगवान राजपूत, शे. अन्सार, गणेश पांढरे, अशोक पाटील, सुनील पाटील, समाधान पाटील, अमोल कालेकर, सुभाष भोसले, नंदू बोरबळे, भगवान पांढरे, o्रीकृष्ण पाटील, समाधान हाडे यांच्यासह केळवद, शिरपूर, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, गिरोला, कोलारी, हातणी आदी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

उपकेंद्र जाळपोळप्रकरणी हरीश रावळ यांच्यासह आंदोलकांवर गुन्हे मलकापूर: तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडे विभागाची वीज गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी अँड. हरिश रावळ, राजू पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता मराविवि खुपचंद उद्धवराव पवार यांनी दिली. यावरून ग्रामीण पोलिसांनी अँड. हरीश रावळ, राजू पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, विजय पाटीलसह अधिक ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाबुंळधाबा उपकेंद्रांतर्गत येणार्‍या खेडे विभागातील दहा रोहित्रांचा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त नागरिकांसह त्यांनी ही जाळपोळ केली होती. वीज वितरणचे नुकसान केल्याप्रकरणी अँड. हरीश रावळ, राजू पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, ज्ञानेश्‍वर निकम, विजय पाटील, यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भारतीय विद्युत अधिनियम १३८ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कलम १४३, ४४८, ४३५, १८६ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन केल्यानंतर असे गुन्हे दाखल होत असतील तर आपण माघार घेणार नाही. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू , अशी प्रतिक्रिया अँड. हरीश रावळ यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्हय़ात वीज वितरण विरोधात जनमानसात रोष दिसत असून, चिखली तालुक्यातील किन्होळा येथेही सलग दुसर्‍या दिवशी त्याचे प्रतिबिंब उमटले. येथेही काँग्रसचे चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत वीज वितरणच्या कार्यालयातील टेबल जाळला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरणRahul Bondreराहुल बोंद्रे