शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजातील ५० कोटींच्या गुंतवणुकीला ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:03 IST

Sindkhed Raja : ५० कोटी रुपयांच्या टिश्यू कल्चर प्रोजेक्टला वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मोठा फटका बसत आहे

- मुकुंद पाठकलोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: केंद्र सरकारचे मेक इन इंडिया अंतर्गत उद्योगांना उभारी देण्याचे धोरण असले तरी सिंदखेड राजा येथे स्थापन केलेल्या ५० कोटी रुपयांच्या टिश्यू कल्चर प्रोजेक्टला वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आणखी ५० कोटी रुपये खर्च करून येथे उभारण्यात येणाऱ्या ईश्ववेद फूड प्रोसेसींग प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीलाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे.सिंदखेड राजाचे भूमीपुत्र तथा ईश्ववेद उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी या अडथळ्याच्या शर्यतीमुळे सिंदखेड राजात उभारण्यात येणारा खाद्य प्रक्रिया उद्योग अन्यत्र हलविण्याची मानसीकता दाखविली आहे. वास्तविक त्यांनी २०१४ मध्ये मोठी गुंतवणूक करून सिंदखेड राजा येथे ईश्ववेद बायोटेक नावाने टिश्यू कल्चर प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सिंदखेड राजातील २०० व परिसरातील २०० अशा ४०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला; मात्र वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या समस्येमुळे या उद्योगाला येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिंदखेड राजात सुरू करावयाचा नवीन खाद्य प्रक्रिया उद्योग ते अन्यत्र उभारणार आहेत.अैाद्योगिकदृष्ट्या डी प्लसमध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर व काही प्रमाणात चिखली येथे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे सिंदखेड राजा येथे उद्योग उभारल्या जात असेल तर तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पच ठरावा. पण येथे केलेल्या गुंतवणुकीचा अभिमान बाळगावा की मनस्ताप सहन करावा, अशी मानसीकता सध्या संजय वायाळ यांची बनली आहे. कारण ‘ईश्ववेद’ साठी वीज वितरण कंपनीकडून स्वतंत्र फिडर मिळावे, यासाठी वायाळ यांनी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र एक्स्प्रेस फिडर सोडा पण विजेच्या वाढत्या फ्लकचुवेशनचा मोठा फटका सध्या कार्यरत असलेल्या टिश्यू कल्चर उद्योगाला बसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतरही प्रश्न सुटण्याऐवजी त्यांच्या अनाकलनीय उत्तरांनी मनस्ताप होत असल्याचे वायाळ यांचे म्हणणे आहे. टिशू कल्चर प्रकल्प मोठ्या उत्साहाने इथे आणला पण आगामी फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट आपण सिंदखेडराजा येथे स्थापन करणार नसल्याचे ते म्हणाले.

प्रोजेक्ट अन्यत्र उभारणारया प्रोजेक्टसाठी ५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून या द्वारे शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता, तर ५ हजार शेतकऱ्यांना यात सामावून घेण्याची क्षमता होती; परंतु महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट येथे स्थापन करणे शक्य नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया ईश्ववेद व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली आहे.

ईश्ववेद कंपनीला वीज कनेक्शन गावठाण फिडरवरून आहे. या फिडरवर १३ गावांना वीज पुरवठा आहे.  या गावात वीजेसंदर्भात कुठेही अडचण आल्यास संपूर्ण वीज पुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे कंपनीला खंडित वीज पुरवठ्याच्या अडचणीला सामोरे जावे लागते. कंपनी असलेला भाग हा औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे तेथे आवश्यक वीज सुविधा नाहीत. अखंडित वीज पुरवठा हवा असल्यास त्यांना एक्स्प्रेस फिडर स्वतः च्या खर्चातून घ्यावे लागणार आहे. त्यांनी तसा प्रस्ताव दिल्यास वीज कंपनी संपूर्ण सहकार्य करेन.- ए. एम. खान उपअभियंता, महावितरण कंपनी, सिंदखेड राजा

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाmahavitaranमहावितरण