शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

बेफिकिरी भोवली; वेळीच सावध व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:44 AM

सुधीर चेके पाटील। चिखली कोरोनामुळे गेल्यावर्षी तब्बल ७ महिने अक्षरश: घरातच काढावे लागले. ऑक्टोबरपासून थोडा दिलासा मिळत गेला. ...

सुधीर चेके पाटील। चिखली

कोरोनामुळे गेल्यावर्षी तब्बल ७ महिने अक्षरश: घरातच काढावे लागले. ऑक्टोबरपासून थोडा दिलासा मिळत गेला. कोरोनाबाधितांची संख्या अगदी शून्यावर आली. मृत्यूदरही घसरला, लस देखील आली अन् नागरिकांच्या मनातील भीती दूर झाली. परिणामी, मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे याकडे दुर्लक्ष तर झालेच याशिवाय लग्न समारंभ, सावडा-मौतीचे कार्यक्रम, निवडणुकीत आपण बेजबाबदारपणे वागलो... ही बाब सर्वांच्या अंगलट आली आणि 'सुपर स्प्रेडर'मुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला.

अवघ्या १५ दिवसात बाधितांचा आकडा पाचशेवर पोहचला असल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पाच नगर पालिका क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावला आहे. यामध्ये चिखली शहर व तालुकाभरात अवघ्या १५ दिवसात कोरोनाचा विस्फोेट झाल्याचे दिसून आले. 'लाकडाऊन'चा अनेकांनी विराेध केला. वस्तुत: आपणावर लॉकडाऊनची वेळ का आली याचे चिंतन होणे गरजेचे आहे. गतवेळी सर्वचजण सतर्क होते, नियम पाळल्या गेले त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. पण आता मात्र, कोरोनाची भीतीच उरली नाही, असे चित्र आहे. सध्या केवळ प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नियम पाळले जात आहेत, ही वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही. या निष्काळजीपणात सर्वात पुढे तरुणवर्ग असल्याचेही बोलल्या जात आहे. आताही अनेक तरुणांचा मास्क गळ्यातच लटकलेला असतो. फार क्वचितवेळा तो तोंडावर असतो. परिणामी तरुणवर्गाची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने त्यांना काही होत नसले तरी ते 'सुपर स्प्रेडर' म्हणून काम करतात. चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह येतो मात्र, कोरोना कॅरिअर म्हणून त्यांच्यापासून इतरांना बाधा होते. घरातील वृध्दांना यापासून सर्वाधिक धोका असून इतरत्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचं कारण देखील हेच सुपर स्प्रेडर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

तोरणदारी, मरणदारी पुन्हा गर्दी

अनलॉकनंतर मोठ्या संख्येने लग्न उरकण्यात आली. या लग्न सोहळ्यासह सावडा-मौतीच्या कार्यक्रमालाही हजारो नागरिकांची गर्दी मधल्या काळात पहावयास मिळाली. त्यातही तोरणदारी व मरणदारी जमणारी सर्व मंडळी जवळीच आहेत. त्यामुळे मास्क व इतर नियम पाळले नाही तरी चालते, ही बेफिकिरीच आता घातक ठरली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांतही उडाला फज्जा गत महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतही कोरोनाबाबत कमालीची बेफिकिरी दिसून आली. मतदानासाठी मोठ्या शहरात गेलेले अनेक नागरिक घरी परतले, मतमोजणीदरम्यानही प्रचंड गर्दी उसळली. या गर्दीत कोठेही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होताना दिसला नाही. परिणामी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाला आहे.

गंभीरता हवीच !

सध्याचे चित्र पाहता हनुवटीवर अथवा गळ्याभोवती असलेला मास्क पुन्हा तोंडावर लावणे गरजेचे आहे., काहीच होत नाही, कोरोना नाहीच, हा केवळ स्कॅम आहे, असले गैरसमज मनातून काढणे टाकणे देखील गरजेचे आहे. नसता याचा फटका वृध्द व रोगप्रतिकारक्षमता कमी असलेल्या बसल्याशिवाय राहणार नाही. सोबतच कडक लॉकडाऊमुळे पुन्हा सर्वांवर घरी बसण्याची वेळ येणार असल्याने, ही बाब सर्वांनी गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.