शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

भाववाढ विरोधात मेहकरात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:56 IST

 अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून  निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला.

ठळक मुद्देश्याम उमाळकर यांचा आरोप सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी व सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुसह पेट्रोल, डीझलचे भाव दररोज वाढत आहेत. नोटाबंदी, बाजारामध्ये पिकांना भाव नाही, शेतकर्‍यांना वेळेवर कर्जमाफी मिळाली नाही, नवीन पीककर्ज वेळेवर मिळाले  नाही. यांसह  अनेक समस्या भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून  निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना सत्तेमध्ये आहे. शिवसेनेचे मंत्री सत्ता सोडायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा आव आणून भाजपाचे लोकप्रतिनिधी तथा पदाधिकारी आंदोलने करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी केला.   पेट्रोल व डीझलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसच्यावतीने ५ फे ब्रुवारी रोजी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, यावेळी श्याम उमाळकर बोलत होते. या मोर्चात  लक्ष्मणराव घुमरे, नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अँड. अनंतराव वानखेडे, नंदकिशोर बोरे, नाजीम कुरेशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार, भुषणभय्या देशमुख, सुरेश मुंदडा, कैलास सुखधाने, शैलेश सावजी, कलीम खान, वसंतराव देशमुख, शैलेश बावस्कर, वसीम कुरेशी, मो.अलीम मो.ताहेर, आश्रुजी काळे, चित्रांगण खंडारे आदी उपस्थित होते. यावेळी विश्रामगृहापासून बैलगाडी मोर्चाला सुरुवात होऊन जानेफळ चौक, जिजाऊ चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गाने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये होऊन लक्ष्मणराव घुमरे, अँड.अनंतराव वानखेडे, आश्रुजी काळे, नंदकिशोर बोरे, वसंतराव देशमुख, कैलास सुखधाने, शैलेश सावजी, देवानंद पवार आदींची भाषणे झाली. संचालन शैलेश बावस्कर यांनी तर आभार शहराध्यक्ष कलीम खान यांनी मानले. त्यानंतर नायब तहसीलदार मीरा पागोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये प्रदीप देशमुख, विनायक टाले, गबाजी गवई, यासीन कुरेशी, डॉ. भरत आल्हाट, अशोक उबाळे, गणेश बोचरे, बाळासाहेब वानखेडे, नामदेव राठोड, राजेंद्र गायकवाड, युनूस पटेल, शंकर सपकाळ, दिलीप बोरे, गणेश अक्कल, नीलेश मानवतकर, संदीप पांडव, आकाश जावळे, केशवराव देवकर, हुसेन गवळी, संदीप ढोरे, विनोद राठोड, वामन मोरे, अंकुश दाभाडे, शेख लतीफ, संजय सुळकर, युसूफ  पठाण, दिलीप खरात, तुकाराम खरात, विलास शेळके, कंवरसिंग चव्हाण, गजानन लोखंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.      

टॅग्स :Shyam Umalkarश्याम उमाळकरagitationआंदोलनcongressकाँग्रेस