शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

भूजल पातळीत सरासरी दीड मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 4:44 PM

बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वाषिक सरासरीच्या २२ टक्के जादा पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याची भुजल पातळी १.३९ मिटरने वाढल्याचे स्पष्ट झाले असले तरी देऊळगाव राजा, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यात मात्र घट झाल्याचे चित्र आहे.वर्षभरात साधारणत: चार वेळा भूजल पातळीची तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यानुषंगाने ही तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. प्रामुख्याने १.११ मीटर ते ७.६० मिटर दरम्यान ही वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहीरींची पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. मात्र देऊळगाव राजा तालुक्याची भूजल पातळी ही उणे ०.०८, लोणारची उणे ०.१५ आणि सिंदखेड राजाची उणे ०.४५ मीटरने घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात उन्हान्यात प्रसंगी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात होणाऱ्या भुजल पातळीच्या तपासणीत सरासरी भुजल पातळीची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उन्हाळ््यात कोणत्या तालुक्यात प्रसंगी पाणीटंचाी निर्माण होईल, याचा अंदाज बांधणे शक्य होईल, असा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यात यावर्षी फारसी टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागाक अ‍ॅक्वीफोर (जलधर खडक) नसल्याने त्या भागात टंचाईची शक्यता नाकारता येत नाही.

टंचाई आराखडा ४.७३ कोटींचाजिल्ह्यात परतीच्या पावसाने यंदा उच्चांक गाठल्यामुळे पाणीटंचाईची शक्यता कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा हा ४.७३ कोटींच्या घरात आहे. गतवर्षी हाच टंचाई कृती आराखडा सातत्याने वाढत होता. गेल्या वर्षी तब्बल ४९ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च यावर झाला आहे. दरम्यान आॅक्टोबर २०१९ ते जून २०२० पर्यंतचा यंदाचा टंचाई कृती आराखडा पुर्णत्वास गेला असून जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यावर शिक्का मोर्तब केले आहे. डिसेंबर अखेर जिल्ह्यातील २१ गावात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचया २६ योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत.

एप्रिल-जूनमध्ये ३३६ गावात टंचाईजानेवारी मार्च दरम्यान जिल्ह्यातील ९२ गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. दरम्यान, एप्रील ते जून अखेरपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता ही ३३६ गावात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यादृ्ष्टीने प्रशासनाने नियोजन केलेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी