एटीएम बंदच; पैशाचा ठणठणाट
By Admin | Updated: May 3, 2017 14:28 IST2017-05-03T14:28:23+5:302017-05-03T14:28:23+5:30
एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांनादिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे.

एटीएम बंदच; पैशाचा ठणठणाट
सिंदखेडराजा : भारतीय स्टेट बँकांसह इतर बँकांतही पैशाचा ठणठणाट कायम
असून, ग्राहकांना फक्त दोन हजाराच्या वर पैसे मिळत नसल्याने सर्वसामान्य
व्यवहार करणे कठीण झाले आहे. त्याही एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांना
दिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे.
साखरखेर्डा येथे राष्ट्रीय कृत बँक एकच असल्याने या बँकेच्या अखत्यारित
साखरखेर्डा शेंदुर्जन या दोन जिल्हा परिषद सर्कलमधील ४० हून अधिक गावे
येतात. शेतकऱ्याचे चुकारे, पिक विमा रक्कम, शासकीय, निमशासकीय
कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, व्यापारी वर्गाचा
कॅशलेस व्यवहार हहा संपूर्ण भार भारतीय स्टेट बँक साखरखेर्डा शाखेवर
येवून पडला आहे. त्यात सर्व व्यवहार आॅनलाईन झाल्याने नेहमीच बंद पडणारी
इंटनरनेट सेवा यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावाच लागतो. त्यातही
बँकेत पैसे नसल्याने कित्येकवेळा ग्राहकांना परत जावे लागते. केवळ
पैशाअभावी सर्वसामान्य ग्राहकांना व्यवहार करणे कठीण झाले आहे. १ मार्च
पासून बँकेतून कितीही पैसे काढा हा दिंडोरा शासन पिटत असला तर
प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच पहायला मिळत आहे. आजारी व्यक्तीला
रुग्णालयात न्यायचे म्हटले तर पाच हजार ही मिळत नाही. अशी दयनीय अवस्था
झाली आहे. बँकेतच पैसे नसल्याने एटीएममध्ये कोठून टाकावे, असा प्रश्न
शाखा व्यवस्थापक कोळी यांनी उपस्थित केला. त्यातही ग्राहकांची वाढती
संख्या लक्षात घेता कर्मचारी वाढले पण बँकेत बसण्यासाठी जागा नाही.
त्यासाठी कित्येक वेळा बाहेर बसून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
आरटीजीएस बँकेतून करायचे म्हटले तर अगोदर बँकेत कॅश भरा, त्यासाठी रांगेत
उभे रहा, इतर चेक आणि फॉर्म भरुन बँकेत दया, कर्मचाऱ्यांना वेळ मिळेल
तेव्हा ते आरटीजीएस करतात. काही इतर बँकेत आरटीजीएस व्यवहार म्हणजे
डोकेदुखी समजल्या जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला पाच
पाच दिवस कॅशलेस व्यवहार होत नाही का झाला नाही व्यवहार तर डबल फॉर्म
भरुन द्या, असे उत्तर मिळते. काम सोडून या पारदर्शी व्यवहारातच
व्यापाऱ्यांचा वेळ खर्ची होत आहे. या व्यवहारात सुधारणा करुन ग्राहकांना होणारा
त्रास थांबवावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)