शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध

By सदानंद सिरसाट | Updated: April 22, 2023 16:30 IST

जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रे सुरू करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

वरवट बकाल, खामगाव -बुलढाणा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात अक्षय तृतीयेनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा नैवेद्य व पान टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाचे श्राद्ध घालून निषेध करण्यात आला.

जिल्ह्यातील १५ दिवसांपासून बंद असलेले शासकीय हरभरा खरेदी केंद्रे चालू करा, खरिपातील लाल कांद्याला अनुदान घोषित केले त्याच धरतीवर विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला अनुदान द्या. संग्रामपूर, जळगाव तालुक्यात चक्री वादळाने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून आपत्तग्रस्तांना घरे बांधकामासाठी निधी द्या. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई करून विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करा. सततच्या पाऊस व अतिवृष्टिने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई वाटप करा. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. संग्रामपूर तहसीलच्या गेटसमोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाच्या नावाने केळीच्या पानावर सर्व वस्तूंसह नैवेद्य दाखवण्यात आला.

राळ, कापूर व धूप अगरबत्ती करून सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दोन दिवसांत निर्णायक भूमिका घ्यावी अन्यथा मुंबई विधान भवनासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उज्ज्वल पाटील चोपडे, विजय ठाकरे, सागर मोरखडे, विशाल चोपडे, रामदास सरदार, विलास तराळे, धनंजय कोरडे, अनुप देशमुख, राजेश उमाळे, श्रीकृष्ण शेजोळे, कैलास ठाकरे, अंकुश सुलताने, प्रवीण पोपळणारे, प्रफुल करांगळे, श्रीकृष्ण बोरोकार, संदेश ठोंबरे, योगेश बाजोड, हरिदास आमझरे, श्रीकृष्ण भवर, नंदू दहिकर, दीपक बोयाकेसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :buldhanaबुलडाणाState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी