शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून उभारला १० लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:12 IST

बुलडाणा:   विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत.

बुलडाणा:  दुष्काळातही काहीजण पाण्यासाठी दातृत्व जपत आहेत. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ विदर्भातील ११ जिल्ह्यातून हा निधी उभारण्यात आला असून विदर्भातील जलसंपदा विभागाला दुष्काळात मायेचा पाझर पुटल्याचे दिसून आले. पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातही  २२६ गावांमध्ये २३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन विदर्भातील जलसंपदा विभागाने सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागातील विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अभियंत्यांनी वर्गणी करुन १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे. टंचाई ग्रस्त गावांसाठी सामाजिक बांधीलकी म्हणून  टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येत आहे. या कामासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी चळवळीला चालना देण्यासाठी तीन लाखाची भरीव निधी देऊन योगदान दिले आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थेअंतर्गत टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळात गावकºयांची तहान भागविली जात आहे.  तीन गावांना पाणी पुरवठाया निधीतून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड नाईक, साखळी खुर्द व अकोला जिल्ह्यातील दोनखेडा या दुष्काळ ग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करुन तीन गावांची तहान भाविली जात आहे. रोज या गावात चार फेºयातुन १८ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. साखळी खुर्द येथे सहा फेºयातून २७ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता जलतारे  अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता कन्ना, उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड व जलसंपदा विभागाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहे.  पगारातून दिला निधीपाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावरून टँकर, विहिर अधिग्रहण यासारखे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र सामाजिक बांधीलकीमधून जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांनीही पुढाकार घेतल्या दिसून येत आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अधिकाºयांना आपल्या पगारातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी निधी उभा केला आहे. टंचाईच्या पृष्टभूमीवर विदर्भातील अभियंत्याचा हा उपक्रम आदर्श ठरत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई