शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन

By ram.deshpande | Updated: July 25, 2017 19:38 IST

खामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या जीवितास धोका - मुख्याध्यापकगोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने घेतला होता ठरावगावकर्‍यांनी घेतली ‘एसडीओं’कडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील लांजूड येथे शाळेच्या जवळच बारुदचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. हे गोडाऊन हटविण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेवूनही उपयोग न झाल्याने गावकºयांनी आता एसडीओंकडे धाव घेतली आहे. सदर गोडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुध्दा दिलेले आहे. त्यामुळे बारुदसारख्या विस्फोटकांचे हे गोडाऊन त्वरित हटविणे गरजेचे बनले आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना लांजूड येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, येथील गट नं.१२४ मध्ये रतनलाल पंकजलाल तोष्णीवाल यांच्या मालकीचे गोडाऊन असून त्याची सात-बारामध्ये तलाठी यांनी नोंद केलेली नाही. याअगोदरच्या ग्रामपंचायतच्या कार्यकारिणीने सदर गोडाऊनकरिता ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु ग्रामस्थांना विश्वासात न घेता मासिक सभेतील ठरावाद्वारे सदर प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतने ना हरकत प्रमाणपत्र हे शांतीलाल शर्मा यांना दिले होेते. मात्र शर्मा यांनी ते परस्पर रतनलाल तोष्णीवाल यांना विकले. सदर गोडाऊनमध्ये बारुद या विस्फोटकाची साठवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, पाण्याची व्यवस्था, चौकीदार किंवा साधी वालकंपाऊंड सुध्दा नाही. सदर गोडाऊनपासून थोड्या अंतरावरच महाराष्ट्र विद्यालय नामक शाळा आहे. तसेच आजूबाजूला शेतकरी, शेतमजूर वर्ग काम करित असतो. त्यामुळे एखाद्यावेळी काही अपघात घडल्यास विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होवू शकतो. तसेच गोडाऊनजवळूनच जिगाव प्रकल्पाची मोठी पाईपलाईन गेलेली आहे. याअगोदर एकवेळा स्फोट झाला असता त्यामध्ये महिला व लहान मुलांसह काही जण होरपळले होते. परंतु गोडाऊनमालकाने त्यांना उपचारासाठी कोणतीही मदत केली नाही. तरी सदर गोडाऊन कायमस्वरुपी बंद करण्यात यावे अशी विनंती गावकºयांनी केली आहे. विशेष म्हणजे याअगोदर १ मे २०१७ रोजी लांजूड ग्रामपंचायतने सदर गोडाऊन बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव घेवून त्याद्वारे संबंधितांकडे मागणी केली होती. परंतु काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एसडीओ व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सदर निवेदनवजा तक्रारीवर रविंद्र थेरोकार, गजानन तायडे, गजानन कोटवार, ज्ञानराव थेरोकार, बाळकृष्ण आखरे आदींच्या सह्या आहेत.