शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अंबाबरवा अभयारण्यात चार वाघ, तर सहा बिबट्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 15:16 IST

संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे.यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी येथे केवळ 78 प्राण्यांची झाली होती. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलख चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. दिनांक 18 रोजी दुपारी तीन वाजता पासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रम दिनांक 19 रोजी सकाळी 9  वाजेपर्यंत राबविण्यात आला. निसर्ग अनुभव घेण्यासाठी अभयारण्यात 25 पाणवठ्यावरील  25 मचान उभारण्यात आले होते. यादरम्यान 25 वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 25 वन्यजीव प्रेमींनी यामध्ये नोंदी केल्या. 25 पैकी 17 वन्यजीव प्रेमी अभयारण्यात हजर झाले. यामध्ये नागपूर औरंगाबाद पुणे तसेच गुजरात राज्यातील वन्यजीव प्रेमीनी सहभाग दर्शविला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला आलेल्या प्राणी गणनेमध्ये अंबाबरवा अभयारण्यात 78 प्राण्यांची नोंद घेण्यात आली होती. यामध्ये 18 अस्वल, ३ हरीण, 15 सांभर, 9 गवा, 11 मोर, 7 रान डुक्कर, 2 म्हसण्या उद, व 13 नील गाईंचा समावेश होता. एकाच वर्षात अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे. यावर्षी ऐकून 540 वन प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून यामध्ये वाघ 4, बिबट 6, अस्वल 19, तडस 1, गवा 3, सांबर 14, भेळकी 24, सायाळ 2, म्हसण्या उद 27, नील गाय 47, जंगली डुक्कर 105, माकड 133, व इतर 155 प्राण्यांची नोंद घेण्यात आली. प्राणी गणनेसाठी अंबाबारवा अभयारण्यात कुत्रीम व नैसर्गिक मिळून 25 पाणवठ्यांची संख्या होती. 17 वन्य प्रेमींनी सहभाग दर्शविला. वन कर्मचाऱ्यांची संख्याही 25 होती. अंबाबरवा अभयारण्यात निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपसना रक्षक अकोट टी बेऊला, सहाय्यक वनसंरक्षक एस जे खराटे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर कांबळे, वनपाल एन डी राऊत,  डी डी सोनोने,  एम आर राठोड,  बी एम डुकरे,  एस व्ही कायंदे आदी कर्मचारी प्राणी गणनेला उपस्थित होते.

 

बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव कार्यक्रम  राबविण्यात आला. या कार्यक्रमाला बाहेर राज्यातल्या पर्यटकांनी सहभाग दर्शविला. चंद्राच्या लखलखीत प्रकाशात अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांनी दर्शन दिले. त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

- एस. आर. कांबळे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी सोनाळा

टॅग्स :khamgaonखामगावwildlifeवन्यजीवforestजंगलTigerवाघSangrampurसंग्रामपूर