शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अंबाबरवा अभयारण्यात चार वाघ, तर सहा बिबट्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 15:16 IST

संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे.यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून अंबाबारवा अभयारण्यात 540 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी येथे केवळ 78 प्राण्यांची झाली होती. शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री लखलख चंद्रप्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. दिनांक 18 रोजी दुपारी तीन वाजता पासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रम दिनांक 19 रोजी सकाळी 9  वाजेपर्यंत राबविण्यात आला. निसर्ग अनुभव घेण्यासाठी अभयारण्यात 25 पाणवठ्यावरील  25 मचान उभारण्यात आले होते. यादरम्यान 25 वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 25 वन्यजीव प्रेमींनी यामध्ये नोंदी केल्या. 25 पैकी 17 वन्यजीव प्रेमी अभयारण्यात हजर झाले. यामध्ये नागपूर औरंगाबाद पुणे तसेच गुजरात राज्यातील वन्यजीव प्रेमीनी सहभाग दर्शविला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन केल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला आलेल्या प्राणी गणनेमध्ये अंबाबरवा अभयारण्यात 78 प्राण्यांची नोंद घेण्यात आली होती. यामध्ये 18 अस्वल, ३ हरीण, 15 सांभर, 9 गवा, 11 मोर, 7 रान डुक्कर, 2 म्हसण्या उद, व 13 नील गाईंचा समावेश होता. एकाच वर्षात अंबाबारवा अभयारण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 462 प्राण्यांची वाढ झाली आहे. यावर्षी ऐकून 540 वन प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून यामध्ये वाघ 4, बिबट 6, अस्वल 19, तडस 1, गवा 3, सांबर 14, भेळकी 24, सायाळ 2, म्हसण्या उद 27, नील गाय 47, जंगली डुक्कर 105, माकड 133, व इतर 155 प्राण्यांची नोंद घेण्यात आली. प्राणी गणनेसाठी अंबाबारवा अभयारण्यात कुत्रीम व नैसर्गिक मिळून 25 पाणवठ्यांची संख्या होती. 17 वन्य प्रेमींनी सहभाग दर्शविला. वन कर्मचाऱ्यांची संख्याही 25 होती. अंबाबरवा अभयारण्यात निसर्ग अनुभवाचा कार्यक्रम अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प उपसना रक्षक अकोट टी बेऊला, सहाय्यक वनसंरक्षक एस जे खराटे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर कांबळे, वनपाल एन डी राऊत,  डी डी सोनोने,  एम आर राठोड,  बी एम डुकरे,  एस व्ही कायंदे आदी कर्मचारी प्राणी गणनेला उपस्थित होते.

 

बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव कार्यक्रम  राबविण्यात आला. या कार्यक्रमाला बाहेर राज्यातल्या पर्यटकांनी सहभाग दर्शविला. चंद्राच्या लखलखीत प्रकाशात अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांनी दर्शन दिले. त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

- एस. आर. कांबळे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी सोनाळा

टॅग्स :khamgaonखामगावwildlifeवन्यजीवforestजंगलTigerवाघSangrampurसंग्रामपूर