शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 02:28 IST

माणिकराव ठाकरे यांची पत्रपरिषदेत भाजपवर टीका.

बुलडाणा, दि. २४- नोटाबंदीचा निर्णय हा नियोजन करून घेण्यात आला नाही. शासनाने नोटाबंदी करण्यापूर्वी नागरिकांची फरपट होणार नाही, या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते; मात्र नियोजनशून्य कारभारामुळे सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे मत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.मलकापूरमध्ये दंगल झाल्यानंतर दंगलग्रस्तांची भेट माणिकराव ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथे पत्रकार परिषद घेऊन दंगलीत नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अल्का खंडारे, श्याम उमाळकर, चित्रांगण खंडारे उपस्थित होते. यावेळी माणिकराव ठाकरे म्हणाले, की मलकापूरमध्ये गत काही दिवसांपूर्वी दंगल झाली. या दंगलीत शासकीय मालमत्तेसह नागरिकांच्या वैयक्तिक मालमत्तेचीही हानी झाली. याची नुकसानभरपाई त्यांना मिळायला हवी. या दंगलीसाठी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. कारवाई करताना दोषी कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या धर्माचा आहे, हे न बघता निष्पक्ष कारवाई व्हायला हवी, तसेच याप्रकरणी काही निर्दोष नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करीत निर्दोष असलेल्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली. खोट्या आश्‍वासनांमुळे भाजपला नगरपालिकेत यश लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी नागरिकांना प्रत्येकाच्या खात्यात १४ लाख रुपये येतील, असे खोटे आश्‍वासन देण्यात आले होते. मतदारांनी खात्यात पैसे येतील, या भाबड्या आशेने भाजपला मतदान केले. त्यानंतर आता नोटाबंदीनंतर पुन्हा नागरिकांना आपल्या खात्यात पैसे पडतील, अशी अपेक्षा होती. या आशेवर नगरपालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाले. भाजपच्या नेत्यांनी मतदारांना खोटी आश्‍वासने दिली. त्याचे बळी नागरिक पडले असल्याची तोफ माणिकराव ठाकरे यांनी डागली. जिल्हा परिषदेची युती स्थानिक पातळीवरजिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती करणार आहात काय? याबाबत माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत समविचारी पक्षाशी युती करण्यासाठी काँग्रेस नेहमीच तयार असते. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील स्थिती पाहता निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नेते याबाबत निर्णय घेणार आहेत.