शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:30 IST

शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अतिपावसाने जिल्ह्यात काही ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे. खरडून गेलेल्या जमीनीच्या नुकसानाचा सर्वे करण्याच्या सुचना सर्व तहसील कार्यालयांना आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या आहेत.मृृग नक्षत्र पुर्णत: कोरडा गेला. त्यानंतर मृग व आद्राच्या जोडावर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला तुरळक ठिकाणी झालेल्या पावासने शेतकरी सुखावले. परंतू २५ ते २९ जूनच्या दरम्यान, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातून उगम असलेल्या पैनगंगा नदीला चार वेळा पूरही आला. तर इतरही छोट्या-मोठ्या नद्यांना पूर येऊन गेला. अतिपावसामुळे नदी पात्राच्या काठावरील अनेक ठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे कामे करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेती सज्ज केली होती. पेरणीसाठी गुळगुळीत केलेल्या शेतातील मातीच या पावसाने वाहून गेली. कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, अंभोडा, झरी, दहिद बु., दहिद खु., देऊळघाट, दत्तपुर, उमाळा, पळसखेड, इस्लामपूर, गोंधनखेड, गिरडा, मढ व इतर पैनगंगा नदीच्या काठावरील आणि पैनगंगेला लागून असलेल्या अनेक नाल्याना आलेल्या पुराने हजारो हेक्टरवरील सुपीक जमीन खरडुन गेली. या नैसर्गीक संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.अद्यापपर्यंत जिल्हा आपत्ती विभागाकडे नुकसानाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपत्ती विभागाने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना पत्र पाठवून पावसाने जमीनी खरडून गेल्याने झालेल्या नुकसानाचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या खरडलेल्या जमीनीचे सर्वेक्षण कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत महसूल मंडळकाडून सुरू झाले आहेत.

७० गावांना फटका बसल्याचा अंदाजअतिपावसामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असून, यामध्ये पाच हजार हेक्टर क्षेत्राच्यावर जमीन बाधीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा जवळपास ७० गावांना फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.कृषी सहाय्यक व तलाठी यांच्यामार्फत शेतजमीनी खरडून गेल्याचा सर्वे सुरू आहे. लवकरच नुकसानाचा अहवाल प्राप्त होईल. यामध्ये ७० गावांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- संतोष शिंदे,तहसीलदार, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी