शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:10 IST

कामगंध सापळे लावण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बुलडाणा :  कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येते. मात्र या मोहीमेचा अहवाल कृषी आयुक्तालयांकडे पाठविण्यास टाळाटाळ होत असल्याने २४ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेलाच ‘कीड’! असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्ह्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेला सुरूवात झाली असून कपाशी शेतात व जिनिंगमध्ये कामगंध सापळे लावण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील कापूस पिकाची पेरणी सर्वसाधारणपणे ५ जून २०१८ पासुन सुरू झालेली आहे. या कापूस पिकाचा पेरा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाच्या आगमनाच्या अनुषंगाने झालेला आहे. कापूस पिकाची सद्यस्थिती चार पानांच्या वाढीव अवस्थेपासून फुलकळी सुटण्यापर्यंत आहे. साधारणपणे ४० दिवसानंतर फुलकळीस (पातीस) सुरूवात होते. याच काळात शेंदरी बोंडअळीचे पतंग फुलकळीच्या देठावर अंडी घालतात. शेंदरी बोंडअळीचे पतंगांना कापूस पिकावरील बोंडाचे देठ हे एकमेव अंडी घालण्याचे ठिकाण असून अन्यत्र अंडी घातली जात नाही. या परिस्थितीत कापूस पिकावर आलेल्या फुलकळीच्या देठावर अंडी घालण्यास प्रतिबंध केल्यास शेंदरी बोंडअळी नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तीन वेळा या मोहीमेचा अहवाल कृषी आयुक्तांयाकडे मागूनही दिल्या गेला नाही. त्यामुळे ‘लोकमत’मध्ये राज्यात बोंडअळी नियंत्रण मोहिमेलाच ‘कीड’! असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेवून बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांनी प्रति एकर दोन कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स, ल्युअर्स) याप्रमाणे लावावी, जिनिंग व ऑईल मिल परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी एकरी दोन ऐवजी पाच फेरोमन सापळे लावावी, कापसाच्या जिनिंग व सरकीच्या ऑईल मिल यांनी ३० बाय ३० मीटरवर एक याप्रमाणे शेंदरी बोंडअळीचे फेरोमन ल्युअर्स सात ते आठ फुट उंचीवर लावण्यात यावेत. जिनिंग व ऑईल मिल मालकांनी सरकीच्या असलेला साठा ताडपत्रीने झाकून क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस यांची फवारणी करावी. ऑईल मिल परिसर सरकीमुक्त ठेवण्यात यावा. पावसामुळे ऑईल मिल परिसरात सरकी पडल्यामुळे कापसाचे रोपे उगवून आली असल्यास ती नष्ट करावी. कोणत्याही प्रकारचे सरकी व कापसाचे अवशेष बाहेर न टाकता नष्ट करावीत अशा सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिल्या आहेत. 

असे करा उपाय

फेरोमन सापळ्यामध्ये प्रति दिवशी सात ते आठ पतंग सापडल्यास क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लीटर पाण्यात किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के २० ग्रॅम १० लिटर पाण्यात किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के २५ मिली प्रति १० लीटर फवारणी सायंकाळी ५ वाजेनंतर करावी. प्रतिबंध उपाय म्हणून ३५ ते ४० दिवसाचे पीक झाल्यावर पाती अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी सायंकाळी ५ वाजेनंतर करावी. तसेच निंबोळी अर्काची दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १० ते १२ दिवसांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा