शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या २५0 पाल्यांना घेणार शिक्षणासाठी दत्तक!

By admin | Published: May 28, 2017 4:20 AM

जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्रात गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हजारो शेतकर्यांनी दुष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तींना तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या १५0 पाल्यांना शिक्षणासाठी सातारा येथील जनता शिक्षण संस्था दत्तक घेणार आहे. संस्थेच्यावतीने पाल्यांना दहावीनंतरचे पूर्ण शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. सदर संस्थेचे सदस्य सध्या पश्चिम वर्हाडात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांचा शोध घेण्याकरिता आले आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हजारो शेतकर्यांनी दुष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तींना तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकार काही प्रमाणात आर्थिक मदत करते. राज्यातील अनेक सामाजिक संघटना यांनीही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे सामाजिक कार्य केले आहे. या सामाजिक कार्यात आ पणही खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून वाईच्या जनता शिक्षण संस्थेने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील पाल्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नये, त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून राज्यभरातील सुमारे २५0 मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सन २0१६-१७ पासून या मुलांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ याबरोबरच, किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ, प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे शिक्षण मध्येच थांबू नये, यासाठी त्यांना मोफत निवासी शिक्षण देण्याची संकल्पना संचालक मंडळापुढे मांडली. संचालक मंडळाने तत्काळ मान्यता दिल्याने या सामाजिक कार्याने गती घेतली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना पुढील शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्यावरही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च जनता शिक्षण संस्था करणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. डी. बी. आगरेकर यांनी केले आहे.