राज्य महामार्गावरील खड्ड्यांसह गतिरोधक ठरताहेत अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:20+5:302021-09-24T04:40:20+5:30
मागणी करण्यात आल्यानंतर खड्डे बुजवले, परंतु ते खड्डे एकाच पावसात ‘जैसे थे’ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. मेहकर ते ...

राज्य महामार्गावरील खड्ड्यांसह गतिरोधक ठरताहेत अपघाताला निमंत्रण
मागणी करण्यात आल्यानंतर खड्डे बुजवले, परंतु ते खड्डे एकाच पावसात ‘जैसे थे’ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. मेहकर ते डोणगाव रोडवर दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. या मार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे तीन महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. एवढेच नव्हे तर स्थानिक नागापूर व डोणगावजवळ असलेल्या गतिरोधकावर पट्टे नसल्याने व हे गतिरोधक काही ठिकाणी दबले तर काही ठिकाणी उंच झाल्याने व वाहनधारकाच्या लक्षात येत नसल्याने अनेक वाहनधारकांना थोडक्यात आपला जीव वाचविता आला आहे. याबाबत वाहनधारक तसेच डोणगावचे ठाणेदार नीलेश अपसुंदे व जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी राज्य विकास महामंडळ व ठेकेदार यांना सांगूनही थातूरमातूर खड्डे बुजवले व परत खड्डे उखडल्याने या महामार्गावर त्वरित डांबरीकरण करून खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.