पीकविम्याचे ९0 कोटी रुपये पडून
By Admin | Updated: July 18, 2015 02:14 IST2015-07-18T02:14:15+5:302015-07-18T02:14:15+5:30
पीकविम्याचे बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना सुमारे ९१ कोटी रुपये मंजूर; मात्र अद्याप शेतक-यांना वाटप नाही.

पीकविम्याचे ९0 कोटी रुपये पडून
बुलडाणा : राष्ट्रीय पीकविमा योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणावर विमा काढला होता. या पीकविम्याचे जिल्ह्यातील शेतकर्यांना सुमारे ९१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत; मात्र ही रक्कम अद्याप शेतकर्यांना मिळाली नाही. बँकेत पडून असलेली ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात वळती केल्यास दुबार पेरणीसाठी शेतकर्यांना हातभार लागू शकतो. यासंदर्भात येथील सुनील तायडे, कौतिक पाटील, गणेश रिंढे पंडित नप्ते, सुनील गवई, दिलीप जाधव यांच्यासह ४0 शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली असता, ९0 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात जवळपास ७0 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मागील २५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकर्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. एकीकडे अनेक शेतकरी अद्याप पीक कर्जापासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक विम्याची रक्कम मोलाचा हातभार लावू शेकते. या आर्थिक संकटाच्या वेळी शेतकर्यांना दिलासा मिळाला नाही तर शेतकर्यांची मानसिकता खराब होऊन ते आत्महत्या सारखा मार्ग अवलंबवितात. शेतकर्यांना पुन्हा एकादा नव्या उमेदीने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी शेतकर्यांची पीक विम्याची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी. जेणे करून याच पैशातून शेतकरी पुन्हा बी-बियाणे खरेदी करून नव्याने पेरणी करू शकतो. तेव्हा शेतकर्यांच्या पीक विम्याची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.