शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रेल्वेच्या  धडकेत ९ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जलंब :   रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कजलंब :  रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता जलंब परिसरात घडली. या घटनेमुळे पशुपालक व शेतकºयांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जलंब ते शेगाव रेल्वे लाईनवर जलंब रेल्वे गेट ते पाई मंदिर दरम्यान पहाटे ५ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्सप्रेस व मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत गायी, वासरं, बैल अशी लहान मोठी ९ जनावरे ठार झाली आहेत. आहेत. बहूदा ही जनावरे रेल्वे लाईनवर उभी किंवा रेल्वे लाईन ओलांडत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच शेगाव येथील रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान मृत्युमुखी पडलेली ही ९ जनावरे कोणाची आहेत, याबाबत माहिती कळू शकली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावrailwayरेल्वेAccidentअपघात