शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

५५ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा न देताच हाेणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ...

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात उडी घेतली आहे. मात्र, अभ्यासासाठी दिवस-रात्र एक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील ५५ हजार १०८ विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत.

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मुलांना अभ्यासाची सवय राहिली नसल्याने व यंदादेखील प्रत्यक्ष जून महिन्यातसुद्धा शाळा सुरू होण्याचा मुहूर्त हुकणार असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे सर्वांत जास्त झळ शिक्षण क्षेत्राला बसली असून, गत १५ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण प्रत्यक्ष बंदच आहे. यामुळे मुलांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तालुक्यातील एकूण १५ केंद्रांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळून एकूण २५१ शाळांपैकी ८९ खाजगी, १५१ जिल्हा परिषद शाळा, तर ११ नगर परिषद शाळांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खाजगी शाळेतील ३८ हजार ६७२, जिल्‍हा परिषद शाळांमधील १४ हजार ९५६, तसेच नगर परिषद शाळेतील १४८० विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. यात दहावीच्या ५०२८, तर बारावीच्या २७७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ मात्र, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाचे योग्य फळ मिळणार नसल्याने ते नाराज आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार असल्याने ते अभ्यास करणार नाहीत. रुग्ण कमी झाल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

राम शिंदे (पालक)

पालकांची चिंता वाढली

शाळा सलग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय राहिली नसून अभ्यासाची गोडीसुद्धा कमी झाल्याने पालकांच्याही चिंतेत मोठी भर पडली आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाइल आल्याने गेम खेळणे व इतर प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना सरकारने परीक्षा घ्यायला हवी होती. जेणेकरून परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.