शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

कृषी व कृषी पुरक उद्योगांच्या थकित कर्जावर ५० टक्के सुट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:09 IST

बुलडाणा : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला जोडून स्टेट बँकेने महाराष्ट्रस्तरावर ‘ऋण समाधान योजना’ सुरू केली असून यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्णत: थकित मात्र ‘ड’ वर्गामध्ये मोडणार्या (डी कॅटेगरी) कर्जावर ५० टक्के सुट दिली आहे

ठळक मुद्देओटीएसमध्ये (वन टाईम सेटलमेंट) स्वत:च्या हिश्शाची रक्कम भरू न शकलेल्या राज्यातील हजारो शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे.पीक कर्जाची थकबाकी असलेल्या बुलडाणा, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला जोडून स्टेट बँकेने महाराष्ट्रस्तरावर ‘ऋण समाधान योजना’ सुरू केली असून यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्णत: थकित मात्र ‘ड’ वर्गामध्ये मोडणार्या (डी कॅटेगरी) कर्जावर ५० टक्के सुट दिली आहे. प्रामुख्याने कृषी, कृषी पुरक आणि लघू उद्योगांचा यात समावेश आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसलेल्या परंतू ओटीएसमध्ये (वन टाईम सेटलमेंट) स्वत:च्या हिश्शाची रक्कम भरू न शकलेल्या राज्यातील हजारो शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील कृषी, कृषी पुरक आणि लघू उद्योगासाठी कर्ज घेतलेल्या तब्बल २० हजार ग्राहकांना फायदा होणार असतानाच कॉटन बेल्टमध्ये येत असलेल्या व मोठ्या प्रमाणवर पीक कर्जाची थकबाकी असलेल्या बुलडाणा, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफीमध्ये वन टाईम सेटलमेंट करू न शकलेल्या शेतकर्यांना या योजनेतंर्गत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पीक कर्ज घेण्यासाठी पात्र समजण्यात येईल, असेही स्टेट बँकेच्या बुलडाणा येथील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. स्टेट बँकेने यापूर्वीही अशा योजना आणल्या असल्या तरी या योजनेची व्याप्ती मोठी आहे. राज्य शासनाने शेतकर्यांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये दीड लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी दिली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्यांना वन टाईम सेटलमेंटमध्ये स्वत:च्या हिश्शाचे पैसे भरू शकले नाही, अशा बुलडाणा जिल्ह्यातील ७१८ शेतकर्यानां एकूण सात कोटी ५० लाख रुपयांची ही ५० टक्के सुट मिळणार आहे. वानगी दाखल एखाद्या शेतकर्याकडे स्टेट बँकेचे तीन लाख रुपयांचे पीक कर्ज आहे. राज्य शासनाने दीड लाख रुपये कर्ज माफ केले. मात्र उर्वरित दीड लाख रुपयांची रक्कम ओटीएसद्वारे भरण्यास शेतकर्याजवळ पैसा नाही. त्यामुळे पीक कर्जापासूनही तो वंचित राहला आहे. अशा स्थितीत स्टेट बँकेने तीन लाखाच्या ५० टक्के म्हणजेच दीड लाख रुपये सुट त्या कर्जात देऊन शेतकर्याचे खाते निल करायचे आहे. त्यामुळे परस्पर शेतकर्याचे पीक कर्ज निल होईल. मात्र त्यासाठी शेतकर्याला बँकेकडे तसा रितसर अर्ज करावा लागेल. सोबतच, एकाद्या शेतकर्याकडे साचेचार लाखांचे पीक कर्ज थकित आहे. अशा स्थितीत स्टेट बँक दोन लाख २५ हजार रुपये या पीक कर्जात सुट देईल. राज्य शासनाच्या कर्जमाफीचे दीड लाख रुपये माफ झालेले कर्जही त्यातून वजा होईल आणि शेतकर्यास प्रत्यक्षात वन टाईम सेटलमेंटमध्ये ७५ हजार रुपयेच थकित कर्जापोटी भरावे लागले. अशा स्वरुपाने राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र या ऋण समाधान योजनेतून पूनर्गठीत कर्ज वगळण्यात आलेले आहे. लघु उद्योग व कृषी पुरक उद्योगासाठी कर्ज घेतलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांनाही ही ५० टक्के सुट दिली जाणार असल्याचे बँकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित कर्जदारांनी सुट दिल्यानंतर उर्वरित थकित एक रकमी भरल्यास त्यावरही त्याला ५ टक्के सुट देण्यात येईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीbankबँकFarmerशेतकरी