शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सोयाबीन अनुदानापासून बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:56 IST

बुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्रुटींमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ८८ हजार सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांपैकी तब्बल २८ हजार शेतकरी प्रतिक्विंटल २00 रुपये प्रमाणे मिळणार्‍या या अनुदनापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देत्रुटींमुळे रखडले अनुदानधोरणात्मक निर्णयासाठी प्रस्ताव पाठवणार!

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्रुटींमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ८८ हजार सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांपैकी तब्बल २८ हजार शेतकरी प्रतिक्विंटल २00 रुपये प्रमाणे मिळणार्‍या या अनुदनापासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे हा जिल्हय़ात कळीचा मुद्दा बनला आहे. त्याची धग थेट कृषिमंत्र्यापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणी आता संबंधित शेतकर्‍यांना त्रुटी दुरुस्तीसंदर्भात एक संधी देऊन त्यांना अनुदनाचा लाभ देण्याबाबत  कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी निर्देशित केले आहे.२५ क्विंटल र्मयादेत बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे सोयाबीन अनुदान योजना २0१६ अंतर्गत  लाभ द्यावयाचा होता. त्यासाठी बुलडाणा जिल्हय़ातून ८८ हजार शेतकर्‍यांनी बाजार समितीमार्फत प्रस्ताव दाखल केले होते; मात्र यातील तब्बल २८ हजार शेतकर्‍यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळल्याने हे शेतकरी उपरोक्त निर्धारित र्मयादेत या अनुदनापासून वंचित राहिले होते.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची  ८ जानेवारी रोजी सभा झाली. या सभेमध्ये प्रकर्षाने हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. सोबतच जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडून संबंधित प्रस्तावाबाबात माहिती घेतली. सोबतच त्रुटी असलेल्या शेतकर्‍यांना त्या दुरुस्तीसाठी संधी दिली होती की नाही, याचीही शहानिशा करण्याबाबत त्यांनी विचारणा केली होती. त्यावेळी बुलडाणा जिल्हय़ातील तब्बल २८ हजार शेतकरी या अनुदान लाभासून वंचित राहिले असल्याचे समोर आले होते. 

बँकांकडूनही दिरंगाईबुलडाणा जिल्हय़ातील ५0 हजार ६८५ शेतकर्‍यांचे अर्ज या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यापोटी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास १५ कोटी १९ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. यापैकी काही रक्कम ही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा झाली आहे. अन्य शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे बँकांनीही यासाठी पुढाकार घेण्याची अवश्यकता आहे. अद्यापही तीन कोटी ८८ लाख २९ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.

बाजार समित्यांकडूनच प्रस्ताव नाहीजिल्हय़ातील २८ हजार शेतकरी या अनुदान लाभापासून वंचित असले तरी बाजार समित्यांकडूनच यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळेही प्रशासकीय कामकाजात अडचण येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२ हजार ७९६ शेतकर्‍यांचे प्रस्ताव अद्याप बाजार समित्यांकडून उपलब्ध झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

त्रुटी असलेल्या प्रस्तावासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव बनविण्यात येत असून, तो राज्य शासनास पाठविण्यात येत आहे. जिल्हय़ातील बाजार समित्यांमधूनच हे प्रस्ताव आलेले नाहीत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. जिल्हय़ात २८ हजार शेतकर्‍यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी