शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील २९ लघु प्रकल्प कोरडे; पाणी पुरवठा प्रभावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:03 IST

बुलडाणा : उन्हाळ्यात अनेक गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पूरक असलेल्या जिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पांपैकी ३५ टक्के प्रकल्प अर्थात २९ प्रकल्प मार्च महिन्याच्या मध्यावरच कोरडेठाक पडले आहे. त्यापैकी ३ प्रकल्पावर असलेल्या ६ गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असल्यामुळे या गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. इतर प्रकल्पातही अल्प प्रमाणात जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना त्यामुळे येत्या काळात प्रभावित होण्याची शक्यता असून, टंचाईचे संकट जिल्ह्यात आणखी गडद होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देशहरी , ग्रामीण पाणी पुरवठा प्रभावित ८१ लघु प्रकल्पात १० दलघमी जलसाठा

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उन्हाळ्यात अनेक गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पूरक असलेल्या जिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पांपैकी ३५ टक्के प्रकल्प अर्थात २९ प्रकल्प मार्च महिन्याच्या मध्यावरच कोरडेठाक पडले आहे. त्यापैकी ३ प्रकल्पावर असलेल्या ६ गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असल्यामुळे या गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. इतर प्रकल्पातही अल्प प्रमाणात जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना त्यामुळे येत्या काळात प्रभावित होण्याची शक्यता असून, टंचाईचे संकट जिल्ह्यात आणखी गडद होण्याची भीती आहे.यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी त्याने टप्प्याटप्प्यात ओढ दिल्याने प्रकल्पांमधील जलसाठा तुलनेने कमी होता. त्यातच वातावरणातील उष्मा वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी अवलंबून असणाºया जवळपास १५० गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी दहा टक्के जलसाठा होता. आता तो नऊ टक्क्यांवर आला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.१७ टक्के  जलसाठा होता. आता १८.३२ टक्के जलसाठा आहे. तर ८१ लघु प्रकल्पात ११.६० टक्के जलसाठा होता. आता १० दलघमी जलसाठा आहे.  त्यात जवळपास २९ लघु प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे. अशा लघु प्रकल्पांमध्ये प्रांगी-केसापूर, मातला, बोधेगाव, पाटोदा, अंचरवाडी-१, कटवाडा, अंढेरा, शिवणी अरमाळ, गारडगाव, पिंप्री गवळी, बोरजवळा, जनुना, देऊळगाव कंडपाळ, खळेगाव, अंभोडा, बोरखेडी संत, हिरडव संत, चायगाव, सावंगी माळी-१, कोल्ही गोलार, वारी-२, व्याघ्रा, लोणवाडी, लांजूड, मांडवा, तांदुळवाडी, केशव शिवणी, विद्रुपा, ब्राम्हणवाड या प्रकल्पांचा समावेश आहे.

या परिसरात तीव्र पाणीटंचाईजिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पापैकी शून्य टक्क्यावर पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे त्यावरील हंगामी पाणी पुरवठा योजना यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत.  कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना असणाºयांपैकी मातला लघु प्रकल्पावरील मासरूळ, शिवणी आरमाळ प्रकल्पावरील पाडळी शिंदे व तीन गाव; तसेच अंढेरा गावाच्या पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे या गाव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे इतर उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

टंचाईचा फेरआढावा टंचाईची तीव्रता वाढत असताना प्रशासन फेरआढावा घेत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १५० गावांना होणारा पाणी पुरवठा तसेच नागरी भागातील टंचाईचा आढावा जीवन प्राधिकरण आणि टंचाई विभाग घेत आहे. अद्याप सिंदखेड राजा पालिकेची यासंदर्भातील माहिती प्रशासकीय पातळीवर उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळाल्यानंतर नागरी भागातील टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना अंतिम स्वरूप दिले जाईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा