शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जगातील २५ टक्के लोकसंख्या मानसिक विकारात राहील- गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:38 IST

२०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.

बुलडाणा: क्रुझमधील सुरक्षा रेलींग ओलांडून मिसेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेल्फी काढल्याचा मुद्दा सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत असतानाच सेल्फायटिस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डरसारखे आजार आता समोर येत असून २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.बुलडाणा येथे २१ आॅक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानाच्या निमित्ताने ते बुलडाण्यात आले होते. यावेळी स्थानिक बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सोशल मिडियात वाढता सेल्फीट्रेन्ड, फेसबुक अ‍ॅडिक्ट आणि वतर्ममानस्थितीत भरकटलेला युवक या मुद्यांना धरून त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. वाढता चंगळवाद हा अनेक बाबींसाठी कारणीभूत असून भरकटलेला आजचा युवक, तरुण वर्ग हा आई-वडिलानी आपल्या पाल्यामध्ये मुल्यांची रुजवणूक करणे गरजेचे झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आजची मुले भरकटू लागली असून दुसर्याशी तुलना केल्याने समस्या निर्माण होत आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून ते एक साधन म्हणून उपयुक्त आहे. पाश्चिमात्य संस्कृती आज आपण स्वीकारत आहोत. यूज आणि थ्रो ही संकल्पना आजच्या तरूण पिढीत रुजल्या गेल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यातूनच २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्या ही मानसिक विकारात राहील, असे वक्तव्य त्यांनी केले.दुसरीकडे दिवसातून किमान तीनदा डीपी बदलणेही मानसिक विकारात मोडते. त्यातून आता नव्याने सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डर सारखे आजार समोर येत आहेत. आज सोशल मिडीयाचा वापर थिल्लरपणे चालू आहे. वास्तविक सोशल मिडियाने अनेक चळवळी उभ्या केल्या. ‘मीटू’, जेष्ठ नागरिकांची चळवळ अशा अनेक चळवळी उभ्या राहल्या आहेत. ‘मीटू’ चे संदर्भ आणि अन्वयार्थ काहीसे वेगळे आहेत. मात्र सोशल मिडीयामध्ये ताकद आहे. हे तंत्रज्ञान सकारात्मक दृष्टीकोणातून साधन म्हणून वापरणे योग्य आहे. परंतू त्याच्या अधीन जाणे तितकेसे योग्य नाही, असे ही अच्यूत गोडबोले म्हणाले.‘ईव्हीएम हॅक होऊ शकते पण हियर नाही!’‘ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते पण ते हियर होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही!’ असे वक्तव्य एका प्रश्नाला उत्तर देताना अच्यूत गोडबोले यांनी देऊन पत्रकार परिषदेत हशा पिकविला. लोकशाहीत जर अशा मुद्द्यावरून शंका निर्माण होत असले तर त्या ठिकाणी बॅलेटपेपरवच निवडणूक घेतली जावी. लोकशाहीचा खेळ कशाला. यामध्ये आपण सत्ताधारी पक्षाला दोष देत नाही. विरोधक त्या मुद्द्यावर बोंब मारताहेत. अशा मुद्द्यांशी आपल्याला घेणे नाही. तसेच मिळणारी मते ही एका विशिष्ट पक्षालाच मिळताहेत याबाबतही अपाण सांगू शकत नाही. मात्र जेथे शंका आहे तेथे कशाला खेळ, असे ते म्हणाले.निश्चलीकरण योग्य पण घाईत घेतलेला निर्णयनोटबंदीचा( निश्चलीकरण) घेतलेला निर्णय अथवा कल्पना योग्य आहे. परंतू तो निर्णय घाईघाईत घेतला गेला. नोटांमध्ये ६.८ टक्के पैसा हा काळा पैसा आहे. बाकी काळा पैसा हा प्रॉपर्टी, सोने आणि परदेशात आहे. हजाराची नोट बंद करून दोन हजाराची काढणे तर्कसंगत वाटत नाही. त्यापेक्षा हजाराची नोट बंद करून त्याजागी तेवढ्याच मुल्ल्याच्या ५०० रुपयांचा अतिरिक्त नोटा आणल्या गेल्या असत्या तर अधिक बरे झाले असते. एटीएममधील सॉफ्टवेअरमध्ये जुजबी बदल करून ते फिटअप करता आल्या असत्या. रांगेमध्येही त्यामुळे उभे राहण्याचे काम नव्हते, असे गोडबोले म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य