रोजगार हमीच्या कामात २ कोटींचा अपहार
By Admin | Updated: January 26, 2015 00:54 IST2015-01-26T00:54:04+5:302015-01-26T00:54:04+5:30
बुलडाणा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार; मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३३ अपहाराची प्रकरणे.

रोजगार हमीच्या कामात २ कोटींचा अपहार
सिद्धार्थ आराख / बुलडाणा :
ह्यअध्र्यात तुम्ही अध्र्यात आम्हीह्ण यालाच म्हणतात रोजगार हमी. या उक्तीप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजनेसह अन्य ग्रामविकासाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी ग्राम विकासासाठी नव्हे, तर स्वविकासासाठी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. रोहयोची योजना सुरू झाल्यापासून आजतागायत सुमारे २0३ अपहाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये शासनाच्या २ कोटी ८१ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे सिद्ध झाले आहे. माहितीच्या अधिकारात हे घबाड बाहेर आले आहे.
शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास हा उद्देश समोर ठेवून शासनाने ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अशा विविध योजना सुरू केल्या. त्यातीच रोजगार हमी योजना, जवाहर ग्रमासमृद्धी योजना आणि अलीकडे सुरू झालेली मनरेगा. या योजनेच्या माध्यमातून विहीर खोदणे, तलाव व नाल्यातील गाळ काढणे, नालाबंडिंग, रोपवाटिका केंद्र उभारणे, रस्त्यांची कामे यासारखी कामे केली जातात. मजुराच्या हाताला काम देण्याबरोबरच या माध्यमातून खेड्याचा विकास साधल्या जातो; मात्र कर्मचारी-अधिकार्यांच्या संगनमताने या योजनसाठी येणारा कोट्यवधी रुपयाचा निधी हडप केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २0१४ पर्यंत ८६६ ग्रामपंचायतीमध्ये अपहाराच्या २0३ प्रकरणात २ कोटी ८१ लाख ६५ हजार ८७६ रुपयाचा निधी हडप केल्याचे उघडकीस झाले आहे. यापैकी आतापर्यंत १0२ प्रकरणाची प्रशासनाने चौकशी केली असून, केवळ ५२ प्रकरणे निकाली काढले आहेत.
चौकशीअंती जेमतेम १३ लाख ८४ हजार रुपये वसूल करून शासनाच्या तिजोरीत भरण्यात आले आहेत. तर १0१ प्रकरणांची अद्याप साधी प्राथमिक चौकशीसुद्धा झाली नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे. म्हणजे अजूनही वसुलीस पात्र असलेल्या प्रकरणातून संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांकडून सुमारे दीड कोटी रुपये वसूल करणे बाकी आहेत.