१४१ गाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By Admin | Updated: May 20, 2014 23:52 IST2014-05-20T23:33:45+5:302014-05-20T23:52:15+5:30

वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला.

141 Village Water Supply Scheme launched | १४१ गाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

१४१ गाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

संग्रामपूर : खारपाणपट्टयातील जळगाव जा. आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला. यासाठी २0 मे रोजी सोनाळा येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ.डॉ.संजय कुटे यांनी ही योजना म्हणजे मतदार संघातील जनतेचे विकासात्मक यश असल्याचे मत व्यक्त केले. या भागात क्षारयुक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असल्याने गावागावात पोटाचे व किडनीचे आजार वाढल्याने मतदार संघातील जनता आरोग्याबाबत त्रस्त झाली आहे. यासाठी भूगर्भातून शुध्द पिण्याचे पाणी शक्य नसल्याने वान धरणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वेगळी योजना म्हणून आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्वांच्या सहकार्यातून शासन दरबारी पाण्याचा मुद्दा प्रखरतेने मांडून शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली व त्यातून जळगाव जा. शहर व १४0 गाव पाणीपुरवठा योजना उदयास आली. या योजनेतील पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्येच पाण्याच्या टाकीचे बांधकाम उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदारांसोबत सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख जानराव देशमुख, भाजपाचे राज्य परिषद सदस्य विजय भुतडा, नंदकिशोर अग्रवाल, सरपंचा शकुंतलाबाई गावंडे, जि.प. सदस्या नलिनीताई गावंडे, सभापती जिजाबाई प्रकाश धामोळे, कांचनबाई जयस्वाल, मिनाताई भास्कर, राजवंतीबाई विश्‍वकर्मा, भारत वाघ, जानराव गोरे, प्रमोद गोसावी, निलेश केसाळे, प्रमोद खोद्रे, रमेश खोवले, सोहमआप्पा वडशंकर, श्रीराम दाभाडे, नंदकिशोर विश्‍वकर्मा, रविंद्र दांडगे, मनोज अमानकर, जयराम इंगळे, अशोक मुरूख, श्याम आकोटकार, डॉ.शेख, संजय शिंगणापुरे, तुकाराम काळपांडे, प्रदीप सोळंके, राजेश गोटेचा, राजेश मुयांडे आदिंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदारांनी सदर योजनेचे काम चांगल्या रितीने दज्रेदारपणे झाले पाहिजे व लवकरात लवकर जनतेपर्यंत पाणी पोहचले पाहिजे हाच प्रयत्न असणार आहे. मतदार संघाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्यांचा विश्‍वास जिंकण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करून चांगली माणसे जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणाईचे मने जिंकल्याने मोठय़ा संख्येने यावेळी तरूणांमध्ये जागृती झाली व सत्ता परिवर्तन झाले. आता राज्यासाठीही कामाला लागण्याची वेळ आली आहे. या योजनेत सर्वच गावांचा समावेश आहे. हे सर्व जनतेच्या सहकार्यानेच झाले, असेही सांगितले. संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.शेख यांनी केले.

Web Title: 141 Village Water Supply Scheme launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.