शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:02 IST

बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनामुळे झपाट्याने घटजिल्ह्यातील ८१ लघुप्रकल्पांत ११.०६ दलघमी जलसाठा

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक नदी, नाले तसेच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता; मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा फटका बसण्यास सुरुवात झाली असून, बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी प्रमाणात वाढली होती. तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यात कमी जास्त प्रमाणात वाढ झाली होती, त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी काही गावात पाणीटंचाई जाणवू लागली होती; मात्र मागिल एका आठवड्यापासून विविध प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी १०.५३ टक्के जलसाठा होता. आता १०.२० टक्के जलसाठा आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.३२ टक्के जलसाठा होता. आता २१.१७ टक्के जलसाठा आहे.  याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये आठ दिवसांपूर्वी १२.५५ टक्के जलसाठा होता. आता ११.६० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२.९२ जलसाठा आहे. ही १८.६४ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत १०.५३ दलघमी जलसाठा आहे. ही १७.५६ टक्केवारी आहे. तर खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडला आहे. 

एप्रिल-मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचे संकेत!यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मार्च महिन्यातच जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, वातावरणातील बदलाचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत.  आज रोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ८१ लघुप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये आठ दिवसांपूर्वी १४.२० टक्के जलसाठा होता. आता एकूण १३.४६ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.

पाणी बचतीच्या विविध योजना राबविण्याची गरजजिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून, विविध गावांना पाणी पुरवठा करणाºया योजनेच्या घशाला कोरड पडत आहे. यासाठी पाणी बचतीच्या योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी