शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:02 IST

बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनामुळे झपाट्याने घटजिल्ह्यातील ८१ लघुप्रकल्पांत ११.०६ दलघमी जलसाठा

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक नदी, नाले तसेच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता; मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा फटका बसण्यास सुरुवात झाली असून, बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी प्रमाणात वाढली होती. तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यात कमी जास्त प्रमाणात वाढ झाली होती, त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी काही गावात पाणीटंचाई जाणवू लागली होती; मात्र मागिल एका आठवड्यापासून विविध प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी १०.५३ टक्के जलसाठा होता. आता १०.२० टक्के जलसाठा आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.३२ टक्के जलसाठा होता. आता २१.१७ टक्के जलसाठा आहे.  याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये आठ दिवसांपूर्वी १२.५५ टक्के जलसाठा होता. आता ११.६० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२.९२ जलसाठा आहे. ही १८.६४ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत १०.५३ दलघमी जलसाठा आहे. ही १७.५६ टक्केवारी आहे. तर खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडला आहे. 

एप्रिल-मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचे संकेत!यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मार्च महिन्यातच जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, वातावरणातील बदलाचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत.  आज रोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ८१ लघुप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये आठ दिवसांपूर्वी १४.२० टक्के जलसाठा होता. आता एकूण १३.४६ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.

पाणी बचतीच्या विविध योजना राबविण्याची गरजजिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून, विविध गावांना पाणी पुरवठा करणाºया योजनेच्या घशाला कोरड पडत आहे. यासाठी पाणी बचतीच्या योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी