शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:02 IST

बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देबाष्पीभवनामुळे झपाट्याने घटजिल्ह्यातील ८१ लघुप्रकल्पांत ११.०६ दलघमी जलसाठा

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक नदी, नाले तसेच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता; मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा फटका बसण्यास सुरुवात झाली असून, बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा  आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी प्रमाणात वाढली होती. तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यात कमी जास्त प्रमाणात वाढ झाली होती, त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी काही गावात पाणीटंचाई जाणवू लागली होती; मात्र मागिल एका आठवड्यापासून विविध प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी १०.५३ टक्के जलसाठा होता. आता १०.२० टक्के जलसाठा आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.३२ टक्के जलसाठा होता. आता २१.१७ टक्के जलसाठा आहे.  याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये आठ दिवसांपूर्वी १२.५५ टक्के जलसाठा होता. आता ११.६० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२.९२ जलसाठा आहे. ही १८.६४ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत १०.५३ दलघमी जलसाठा आहे. ही १७.५६ टक्केवारी आहे. तर खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडला आहे. 

एप्रिल-मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचे संकेत!यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मार्च महिन्यातच जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, वातावरणातील बदलाचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत.  आज रोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ८१ लघुप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये आठ दिवसांपूर्वी १४.२० टक्के जलसाठा होता. आता एकूण १३.४६ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.

पाणी बचतीच्या विविध योजना राबविण्याची गरजजिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून, विविध गावांना पाणी पुरवठा करणाºया योजनेच्या घशाला कोरड पडत आहे. यासाठी पाणी बचतीच्या योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी