शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

संग्रामपूरात १२ बालके कुपोषित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 3:28 PM

संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे.

- नारायण सावतकर लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी राज्य शासन नानाविध प्रयत्न करीत असले तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होईना ही गंभीर बाब आहे.कुपोषण हा केवळ आदिवासी भागामधील महत्वाचा प्रश्न बनला आहे. प्रशासनातर्फे अद्याप मे महिन्याचा अहवाल तयार झालेला नाही. कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी आधी सकस आहार खायला दिला जायचा. यामध्ये सुकळी, लापशी, शिरा आदीचा समावेश होता.आता मात्र मटकी, बरबटी, मसूर दाळ, गहू, तेल, मीठ, हळद हा आहार दिला जात आहे. पूर्वी हा आहार अंगणवाडी मध्ये शिजून दिला जात होता. परंतु आता घरपोच सेवा सुरू करण्यात आली. बालकांना घरी दिल्या जाणाऱ्या या अन्न आहारामध्ये घरातील सदस्य या आहार मध्ये सहभागी होतात. त्यामुळे ज्या बाळासाठी आहार दिला जातो. त्यास पुरेसा सकस आहार मिळत नाही. याबाबत पालकामध्ये जनजागृतीची गरज आहे. आदीवासी भागात तरी किमान घरपोच आहार देण्यापेक्षा त्यांना अंगणवाडीत अन्न शिजून देणे योग्य राहील अशाप्रकारच्या प्रतिक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळत आहेत.याशिवाय संग्रामपूर येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयामधील तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद गेल्या चार वर्षा पासून प्रभारीवरच आहे.१५ सप्टेंबर २०१५ रोजी तत्कालीन अधिकारी शेवाळे यांची बदली झाली. तेव्हापासून हे पद कायमस्वरुपी भरण्यात आले नाही. त्यामुळे कामकाज प्रभावित झालेले दिसून येत आहे. आतापर्यंत चार अधिकाऱ्यांनी या पदाचा भार सांभाळला. सध्या हे पद शेगाव येथे कार्यरत असलेल्या कर्मचाºयाकडे आहे. शेगाव वरून संग्रामपूर येथील कारभार पाहणे जाधव यांना जिकरीचे ठरत आहे. शेगावचाच व्याप जाास्त असलयाने त्यांना संग्रामपूर तालुक्यासाठी वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे.कुपोषीत बालकांना सुद्ढ होण्यासाठी शासन स्तरावर चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध योजना राबविल्या गेल्या पाहिजेत. सोबत रिक्त असलेली पदे, कुपोषित बालके असणे ही शोकांतिका आहे. प्रकल्प विभागाने बालकांना वेळोवेळी आहार देणे गरजेचे आहे.- मीनाक्षी हागेजिल्हा परिषद सदस्या, बावनबीर

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूर