शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

तुम्हीच सांगा, उत्पादन खर्चाधारीत शेतमालाला भाव कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:17 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सर्वत्र झपाट्याने बदल होत असताना शेतकऱ्यांचे दिवस पालटताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्यांच्या मुलांना मुली मिळेनाशा झाल्या आहेत. शेतमालातून उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. ही दैन्यावस्था बदलण्यासाठी योजनांसह शेतमालाला उत्पादन खर्चाधारित भाव मिळावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठमोठी आश्वासने देण्यात येतात. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही शेतकऱ्यांसाठी आजवर कोणत्याही सरकारने पाहिजे तसे सकारात्मक निर्णय घेतले नाहीत. तसेच लागवड खर्चानुसार शेतमालाला भाव मिळावा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तीही पूर्ण केली जात नाही. 

ऐकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात येते. शेतमालाला उत्पादन खर्चाधारित हमीभाव देण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. 

निव्वळ जुमलेबाजी होत असल्याची समज आता शेतकऱ्यांना आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाहीत, ही शेतकऱ्यांची खरी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. 

धानाला मिळणारा हमीभाव तुटपुंजा "यंदा कीड व रोगांमुळे गतवर्षीच्या तुलनेत धान पिकाचे उत्पादन कमी झाले. परंतु ज्याप्रमाणे महागाई वाढली त्या तुलनेत धानाला हमी भाव दिला जात नाही. महागाई आसमंतात गेली. धानाचे दर मात्र अद्यापही जमिनीवर आहेत. नैसर्गिक आपत्तीत मदतही तुटपुंजी दिली जाते. उत्पादनातून उत्पादन खर्च सोडा , घेतलेल्या कर्जाचा बोजाही उतरविणे कठीण झाले आहे." - श्रीकांत डोरले, शेतकरी

पीकविमा योजना मृजगळ "शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचा विमा काढला. परंतु प्रत्यक्षात ही योजना विमा कंपन्यांना करोडोंचा मुनाफा कमविण्यासाठीच असल्याची भावना शेतकऱ्यात आहे. नुकसान होऊनही विमा लागू करण्याच्या क्लिष्ट नियमांमुळे शेतकऱ्यांना क्लेम मिळताना दिसत नाही." - विलास पचघरे, शेतकरी

केवळ घोषणा नकोत, प्रत्यक्ष काम व्हावे "शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट हमी भाव, संपूर्ण कर्जमाफी आदी आश्वासनांची खैरात वाटली जाते. परंतु एकही आश्वासन निवडणुका जिंकताच पूर्ण केल्या जात नाही. यामुळे शेतकरी हतबल आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठविताच त्यांचा आवाज शासकीय यंत्रणांच्या प्रभावात दडपला जातो. यामुळे शेतकरी पुर्णतः खचला आहे." - रामभाऊ नेरकर, शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा