शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा, उत्पादन खर्चाधारीत शेतमालाला भाव कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:17 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सर्वत्र झपाट्याने बदल होत असताना शेतकऱ्यांचे दिवस पालटताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्यांच्या मुलांना मुली मिळेनाशा झाल्या आहेत. शेतमालातून उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. ही दैन्यावस्था बदलण्यासाठी योजनांसह शेतमालाला उत्पादन खर्चाधारित भाव मिळावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठमोठी आश्वासने देण्यात येतात. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही शेतकऱ्यांसाठी आजवर कोणत्याही सरकारने पाहिजे तसे सकारात्मक निर्णय घेतले नाहीत. तसेच लागवड खर्चानुसार शेतमालाला भाव मिळावा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तीही पूर्ण केली जात नाही. 

ऐकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात येते. शेतमालाला उत्पादन खर्चाधारित हमीभाव देण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. 

निव्वळ जुमलेबाजी होत असल्याची समज आता शेतकऱ्यांना आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाहीत, ही शेतकऱ्यांची खरी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. 

धानाला मिळणारा हमीभाव तुटपुंजा "यंदा कीड व रोगांमुळे गतवर्षीच्या तुलनेत धान पिकाचे उत्पादन कमी झाले. परंतु ज्याप्रमाणे महागाई वाढली त्या तुलनेत धानाला हमी भाव दिला जात नाही. महागाई आसमंतात गेली. धानाचे दर मात्र अद्यापही जमिनीवर आहेत. नैसर्गिक आपत्तीत मदतही तुटपुंजी दिली जाते. उत्पादनातून उत्पादन खर्च सोडा , घेतलेल्या कर्जाचा बोजाही उतरविणे कठीण झाले आहे." - श्रीकांत डोरले, शेतकरी

पीकविमा योजना मृजगळ "शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचा विमा काढला. परंतु प्रत्यक्षात ही योजना विमा कंपन्यांना करोडोंचा मुनाफा कमविण्यासाठीच असल्याची भावना शेतकऱ्यात आहे. नुकसान होऊनही विमा लागू करण्याच्या क्लिष्ट नियमांमुळे शेतकऱ्यांना क्लेम मिळताना दिसत नाही." - विलास पचघरे, शेतकरी

केवळ घोषणा नकोत, प्रत्यक्ष काम व्हावे "शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट हमी भाव, संपूर्ण कर्जमाफी आदी आश्वासनांची खैरात वाटली जाते. परंतु एकही आश्वासन निवडणुका जिंकताच पूर्ण केल्या जात नाही. यामुळे शेतकरी हतबल आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठविताच त्यांचा आवाज शासकीय यंत्रणांच्या प्रभावात दडपला जातो. यामुळे शेतकरी पुर्णतः खचला आहे." - रामभाऊ नेरकर, शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा