जगाला तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:25+5:30
बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डोंगरे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे, इंजिनियर रुपचंद रामटेके, इंजिनियर मिलिंद लेदे, व प्रबोधनकार बी. सी. वानखेडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जगाला तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : जगाला अहिंसेचे तत्वज्ञान तथागत गौतम बुद्ध यांनी दिले. प्राणीमात्रावर प्रेम, मैत्री व करुणा द्यावे, असे सूत्र त्यांनी जगाला पटवून दिले. बुद्धांचे तत्वज्ञान विज्ञानावर अवलंबून असून सुखाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येकांनी सुख व शांती प्राप्त करण्यासाठी स्वत: तपावे लागते असे सांगितले. जगात शांतता नांदावयाची असेल तर तथागत गौतम बुध्द यांच्या तत्वज्ञानानुसार चालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सार्वजनिक बौद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित सार्वजनिक बौद्ध विहार इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना भदंत संघधातू यांच्या हस्ते करण्यात आली.
बौद्ध विहाराचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते व इंजिनीअर रुपचंद रामटेके यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मिलिंद लेदे, प्रबोधनकार बी. सी. वानखेडे, सार्वजनिक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप उके व सचिव देवदास डोंगरे उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे, इंजिनियर रुपचंद रामटेके, इंजिनियर मिलिंद लेदे, व प्रबोधनकार बी. सी. वानखेडे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अनमोल चव्हाण, कल्याण डोंगरे, राजेश मेश्राम, रमेश रामटेके, दिलीप गजभिये, रवींद्र बोरकर, प्रमोद वासनिक, सत्यवती मेश्राम, विवेक बौद्ध व विनायक कांबळे उपस्थित होते.
संचालन तथागत मेश्राम, प्रास्ताविक देवदास डोंगरे व आभार प्रमोद वासनिक यांनी मानले. कार्यक्रमास माजी सरपंच संजय मिरासे, माजी उपसरपंच मिलिंद रामटेके, मिलिंद धारगावे, शरदचंद्र वासनिक, श्रीकांत रामटेके, वसंत हुमणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, संघरत्न उके, सीमा डोंगरे, मंदा साखरवाडे , शिल्पा गजभिये, राष्ट्रपाल नारनवरे, शुभांगी गणवीर, अरविंद येळणे, राजू भाजीपाले, संगीता सुखानी, सुनील बन्सोड, शेखर मडामे आदी उपस्थित होते.